शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

वैज्ञानिक दृष्टीकोनाचा देशात आजही अभाव

By admin | Published: November 11, 2015 1:45 AM

भारतातील संशोधनाची स्थिती दयनीय आहे. परदेशातून आलेल्या तंत्रज्ञानावर देश अवलंबून आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळांचे काम निराशाजनक आहे.

पुणे : भारतातील संशोधनाची स्थिती दयनीय आहे. परदेशातून आलेल्या तंत्रज्ञानावर देश अवलंबून आहे. राष्ट्रीय प्रयोगशाळांचे काम निराशाजनक आहे. जग खूप प्रगत झालेले असताना आपल्याकडे आजही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव असून त्याबाबत अशिक्षितता पहायला मिळते, अशी खंत ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विचारवंत दत्तप्रसाद दाभोळकर यांनी व्यक्त केली.अच्युत गोेडबोले आणि दीपा देशमुख लिखित ‘जग बदलणारे १२ जिनियस’ या पुस्तिकांच्या संचाचे प्रकाशन दाभोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक आणि चित्रकार अनिल अवचट उपस्थित होते. या प्रसंगी ‘मनोविकास’ प्रकाशनचे अरंविद पाटकरही उपस्थित होते. दाभोळकर म्हणाले, देश विज्ञानयुगात नेण्याचे विवेकानंदांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सध्याच्या सैरभैर झालेल्या पिढीला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. ते म्हणाले, आपल्याकडे मुर्तीला भातुकलीचे स्वरूप दिले जाते. असे करुन आपण देवाला छोटे करत आहोत. आपल्या आजूबाजूला विज्ञानाची अनेक साधने उपलब्ध असताना ती वापरण्याची प्रगल्भता आपल्याकडे नाही. हे चित्र बदलण्याच्या दृष्टीने विज्ञानाचा दृष्टीकोन अधिकाधिक व्यापक व्हायला हवा. विज्ञान हे वरदान आहे. त्यातील मूलनिरपेक्षता, कोरडेपणा नष्ट होऊन निरिक्षण पध्दती विकसित केल्यास विज्ञानाची गोडी निर्माण होईल. (प्रतिनिधी)