शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शांताताई रानडे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 19:43 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या.

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉ.शांताताई मधुकर रानडे यांचे बुधवारी (दि.5) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुण्यातील साठे हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे एक मुलगी सुषमा दातार, जावई,डॉ.अभय दातार,सुजय दातार हे नातू आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समिती, लोकशाही उत्सव समिती अशा अनेक गटांबरोबर त्या कार्यरत होत्या.त्यांचे वडील कै. गणेश रामचंद्र साठे हे जुन्या पिढीतील साठे बिस्कीट कंपनीचे संस्थापक आणि नामवंत कारखानदार होते. कॉ. रानडे यांचे शिक्षण एस.एन.डी.टी महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन काळातच त्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होऊ लागल्या आणि मार्क्सवादाकडे आकर्षित झाल्या आणि १९४७ पासून मृत्युपर्यंत त्या भाकपच्या सक्रिय सदस्य होत्या. पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेच्या त्या काही काळ सदस्य होत्या. कॉ. श्रीपाद अमृत डांगे, भाई विष्णुपंत चितळे, कॉ. ए.बी. बर्धन, कॉ. गीता मुखर्जी आदिंसोबत त्यांनी काम केले.संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्तीचा सत्याग्रह, बेळगाव सत्याग्रह यांच्यात त्यांचा सहभाग होता आणि त्यासाठी त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. तसेच पक्षाच्या विविध आंदोलनांदरम्यान देखील त्यांना अनेक वेळा तुरुंगवास झाला. कॉ. रानडे यांचा भारतीय महिला फेडरेशन, श्रमिक महिला समिती आदि विविध महिला संघटनांच्या कामात सक्रीय सहभाग होता. तसेच पुण्यातील विविध डाव्या लोकशाहीवादी संस्था-संघटना यांच्या कार्यात त्यांचा सहभाग होता. गेली अनेक वर्ष पुण्यात आयोजित होत असलेल्या लोकशाही उत्सवाच्या आयोजनात त्या पहिल्यापासून सहभागी होत्या. कॉ.रानडे या रशियन अभ्यासक होत्या. त्यांनी मॉस्को विद्यापीठातून रशियन भाषेच्या अध्यापनाचा अभ्यासक्रम पुर्ण केला तसेच पुणे विद्यापीठातून रशिन विषयात एम.ए केले. पुण्यात त्यांनी काही काळ रशियन भाषेचे अध्यापन केले. नामवंत रशियन कादंबरीकार कॉन्सटांटिन पाऊस्तोवस्की यांच्या एका कादंबरीचा मराठीमध्ये ह्यसागराचा जन्म या नावाने अनुवाद केला होता. या अनुवादासाठी त्यांना सोव्हिएट लँड नेहरु पुरस्कार मिळाला होता. या बरोबरच त्यांनी इतर अनेक पुस्तिका लिहिल्या आहेत तसेचअनेक पुस्तकांची भाषांतरे केली आहेत. महाराष्ट्र भाकपच्या युगांतर या मुखपत्रासाठी त्या नियमितपणे लेख अनुवादित करीत असत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अधिक वेळ पार्थिव शरीर ठेवता येणार नसल्याने ते घरी न नेता, आज सायंकाळी सातच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :social workerसमाजसेवकDeathमृत्यू