शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
4
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
5
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
6
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
7
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
8
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
9
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
10
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
11
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
12
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
13
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
14
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
15
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
16
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
17
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
18
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
19
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
20
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी

"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 9:43 PM

अजित पवारांची शरद पवारांवर टीका...

नारायणगाव (पुणे) : परकीय व्यक्ती आपल्या देशाचे पंतप्रधान नसावी म्हणून शरद पवार, पी. ए. संगमा, तारीक अन्वर यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सन १९९९ काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. चारच महिन्यांत विलासराव देशमुख यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील झाले. त्यावेळी परकीय मुद्दा कुठे गेला? सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष होत्या, मग त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यावेळी कसा घेतला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला. ममता बनर्जी स्वंतत्र निवडणूक लढविणार, पंजाब मुख्यमंत्री वेगळे लढणार, अशा पद्धतीने देश चालेल का? आघाडीत मोदीविरोधी सक्षम पर्याय आहे का? असा सवाल करून नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले .

दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसकडून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण तर भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी असताना ती संधी का दिली गेली नाही? छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांना संधी द्यायला हवी होती, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपळवंडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, सभापती संजय काळे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, गणपत फुलवडे, भगवान पासलकर, शरद लेंडे, रघुनाथ लेंडे, अशोक घोलप, किशोर दांगट, गुलाब नेहेरकर, भाऊ देवाडे, उज्वला शेवाळे वैष्णवी चतुर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यांना भाजप का चालत नाही?

अजित पवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार पडताना सगळ्यांनी भाजप सोबत जाण्याचे ठरवले. पवार साहेबांना शिवसेनेत गेलेले चालते पण भाजपसोबत गेलेले का चालत नाही? वरिष्ठांनी निर्णय घेतला तो बरोबर , आम्ही निर्णय घेतला तो बरोबर नाही, असं कसं? असा सवाल अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना विचारला. राजकारणात हेतू परस्पर आरोप केला जातो. माझ्यावर ७० हजार कोटी रुपये भ्रष्टाचार आरोप केला. १९६० पासून जलसंपदा विभाने ४५  हजार कोटी खर्च केले आणि माझ्या आरोप होतो ७० हजार कोटीचा.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSonia Gandhiसोनिया गांधी