शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
3
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
4
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
5
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
6
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
7
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
8
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
9
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
10
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
11
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
12
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
13
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
14
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
15
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
16
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
17
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
18
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
19
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'

शरद पवारांनी मला मोजत बसू नये, सोयीने ‘प्रबोधनकार’ वाचू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “महाराष्ट्राने देशाला विचार दिला. महाराष्ट्रात असे नेते निर्माण झाले जे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. महाराष्ट्र जातीपातीच्या राजकारणातून बाहेर पडला पाहिजे, यासाठी मी ‘ते’ विधान केले होते. माझ्या वक्तव्याचा आणि प्रबोधनकारांचा काय संबंध,” असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. मी काय वाचले हे माझे मला माहिती आहे. मी प्रबोधनकार ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले आहेत. ‘प्रबोधनकारां’ची पुस्तके वाचली आहेत का? हा प्रश्न कुठून आला? ‘प्रबोधनकारां’चे सोयीनुसार वाचन तुम्ही करता का, असा प्रश्न ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. “उगाच मला मोजायचा प्रयत्न करू नका. प्रबोधनकार ठाकरे तुम्हाला परवडणारे नाहीत. पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते तुम्हाला कळेल, या शब्दांत ठाकरे यांनी पवारांना फटकारले.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शतकी वाढदिवसानिमित्त ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा संदर्भ घेऊन शरद पवार यांनी राज यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे लेखन वाचण्याचा सल्ला दिला होता. त्याला राज यांनी शुक्रवारी (दि.२०) पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले.

ठाकरे म्हणाले, “एकदा शरद पवारांची मुलाखत घेतली होती. तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला होता की, महाराष्ट्राला एकत्र आणायचे असेल तर तो केंद्रबिंदू कोणता? त्यावर पवारांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हटले होते. मग, तुमच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांनी न होता ‘फुले-शाहू-आंबेडकर’ अशी कशी होते? तुम्ही यांचा विचार घेऊन पुढे जाणार तर मग छत्रपती शिवाजी महाराज यांचा मूळ विचार घेऊन पुढे का जात नाही,” असा सवाल त्यांनी शरद पवारांना उद्देशून केला.

“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे ते ‘ब्राह्मण’ आहेत म्हणून नव्हे तर ते इतिहास संशोधक आहेत म्हणून मी जातो. त्यांनी चुकीचा इतिहास लिहिला असेल तर कुठला इतिहास चुकीचा लिहिला तो पुढे आणावा. त्यांच्या पुस्तकाची पन्नास साली पहिली आवृत्ती आली. तेव्हापासून काही पुढे आले नाही. राजकारणासाठी एजंट नेमले गेले त्यांच्याकडून हे पसरवले जाते. जेम्स लेन कोण? कुठे गेला? आग लावण्यासाठी आला आणि गायब झाला. हे सगळं व्यवस्थित नियोजन होते,” असा आरोपही ठाकरे यांनी केला. जाती-जातीत तेढ निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे. जातीचे संदर्भ देऊन ऐतिहासिक संदर्भ सांगण्याचा काही संबंध आहे का? महाराष्ट्राला खेळवले जात आहे. जनतेने हे समजून घ्यावे, असे ते म्हणाले.