शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

शरद पवार खोटं बोलले; बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही, ब्राह्मण महासंघाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 14:54 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ब्राह्मणांना आरक्षण हवे हा मुद्दाच निघालेला नाही

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ब्राह्मणांना आरक्षण हवे हा मुद्दाच निघालेला नाही. पवार यासंदर्भात जे सांगतायेत ते खोटं असल्याचा दावा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केला. शनिवारी सायंकाळी राज्यातील १२ संघटनांच्या ४० प्रतिनिधींची पवार यांच्या समवेत पुण्यामध्ये काही मुद्द्यांवरून बैठक झाली होती.

स्वत: पवार यांनीच या बैठकीची माहिती पत्रकारांना देताना काही प्रतिनिधींनी ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती असे सांगितले होते. हे शक्य नाही असे सांगताना आपल्याकडील काही आकडेवारीची माहिती त्यांना दिली. त्यावरून लोकसंख्येच्या प्रमाणात नोकऱ्यांमध्ये या समाजाची संख्या जास्त दिसते. त्यामुळे आरक्षण मिळणे शक्य नाही, मात्र ग्रामीण भागातून शहरांमध्ये येणाऱ्या ब्राह्मण समाजातील युवकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत त्यांची बैठक करून देण्याचे आश्वासन त्यांना दिले असे पवार यांनीच बैठकीत सांगितले.

आता कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, आरक्षणाचा विषयच बैठकीत झालेला नाही. यासंबधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कोणालाच आरक्षण नको अशी काहीजणांची भूमिका होती, मात्र पवार यांनी त्याचे खंडन करताना दलित, आदिवासी तसेच मागास समाजाला त्यांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी आरक्षण असायला हवे अशी भूमिका व्यक्त केली. ब्राह्मण समाजाचा कोणत्याही आरक्षणाला विरोध नाही, घटनेने दिलेले आरक्षण समाजाला मान्यच आहे. त्या बैठकीत ब्राह्मण समाजाला आरक्षण हवे असा मुद्दा कोणीच मांडलेला नाही असे कुलकर्णी यांचे म्हणणे आहे. बैठकीला उपस्थित अन्य ५ संघटनांनीही असा खुलासा केला असल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान ब्राह्मण समाजाच्या काही संघटनांमध्येच या बैठकीवरून वादावादी सुरू झाल्याची चर्चा आहे. या बैठकीला गेलातच का, बैठकीला हजर होते ते म्हणजे समस्त ब्राह्मण समाज नाही, पवारांसारख्या कोणालाही खिशात घालणाऱ्या नेत्यासमवेत बैठक घेतलीच कशाला असे आक्षेप यावर घेण्यात येत आहेत.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbrahman mahasanghब्राह्मण महासंघreservationआरक्षणSocialसामाजिक