शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले; राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 1:04 PM

समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं

पुणे : राज्यातील पुरोगामित्व टिकविण्यासाठी शरद पवार (Sharad Pawar) हे पूर्ण ताकदीने काम करीत आहेत. त्यामुळे जाती-पातीचे राजकारण दुसरे लोक करीत आहेत. त्या लोकांबाबत बोलाल तर मी समजू शकतो. पण शरद पवार यांनी कधीही जाती-पातीचे राजकारण केले नाही. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगितले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या भेटी व पक्षप्रवेशानिमित्त पाटील पुण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्ते, कलाकार, लेखक, संगीतकार यांनी पक्षप्रवेश केला. त्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

राज्यात जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्या आरोपाबाबत विचारले असता जयंत पाटील म्हणाले, सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन शरद पवार आयुष्यभर चालले आहेत. समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला पुढे आणून मोठे करण्याच काम शरद पवार यांनी केलं आहे. मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षात लोक प्रवेश करत आहेत. अनेक लोकांना शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे आहे. अजून आम्ही इंदापूरपर्यंत पोहोचलो नाही. आमदार अतुल बेनके यांच्या मनात काय आहे मला माहीत नाही. मदन भोसले यांना मी भेटलो आहे. पण पक्षप्रवेशाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मी त्यांच्याकडे चहाला गेलो होतो. समरजित घाटगे यांचा ३ सप्टेंबरला पक्षप्रवेश होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

सध्याचे सरकार हे नाकर्तेपणाचे लक्षण असणारे

"राज्य सरकार हे केवळ लाडकी बहीण या एकाच योजनेभोवती फिरत आहे. बाकी राज्यात कुठल्याच योजना, कुठलेच विषय त्यांना दिसत नाहीत. बदलापूरची घटना सामान्य माणसाला चीड आणणारी आहे. यावर कोणी राजकारण करायची गरज नाही. लहान बालक सुरक्षित नाहीत, हे सरकार नाकारत आहे. महिला सुरक्षित नाहीत. इतके नाकर्तेपणाचे लक्षण यापूर्वीच्या कुठल्याही सरकारमध्ये नव्हते. त्यामुळे राज्यातील सरकार अक्षरशः अपयशी ठरलेले आहे. आमचा कोणत्या योजनेला विरोध नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांची राजकीयदृष्ट्या योग्य पद्धतीने पावले चालली असतील. मराठा समाजात आजही दारिद्र्य, अल्पभूधारक असे प्रश्न काय आहेत, असेही त्यांनी सांगितले.

जागावाटपाबाबत काही वाद होणं अपेक्षितच

विधानसभेच्या २८८ जागा आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे. त्यामुळे जागावाटपाबाबत काही वाद होणं अपेक्षितच आहे. त्यामुळे त्याची चर्चा होणं, त्याबद्दल वाद होणार नाही, असं होणार नाही. पण शेवटी आम्हाला एकत्र राहायचं आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकमेकांना समजून घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारJayant Patilजयंत पाटीलMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षRaj Thackerayराज ठाकरे