शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

‘महावितरण’ कारभाराचा नागरिकांना बसतोय ‘शॉक’

By admin | Published: March 28, 2017 2:20 AM

महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे

पिंपळवंडी : महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसत आहे. या मनमानी कारभारात सुधारणा न झाल्यास महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.परिसरात महावितरण कंपनीने अनेक ग्राहकांना फ्लॅश कंपनीचे मीटर बसविले आहे. हे मीटर प्रमाणापेक्षा जास्त वेगाने पळते. त्यामुळे ग्राहकांना जादा वीजबिल येत आहेत. याबाबत सुमारे एक हजार ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर, या बोगस मीटरची तपासणी करण्यात आली. या तपासणीत मीटर प्रमाणापेक्षा जास्त पळत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, महावितरण कंपनीकडे नवीन मीटर नसल्याने एक महिन्यापूर्वी पुन्हा तेच नादुरुस्त मीटर बसविले आहेत, एक महिन्याचा कालावधी होऊनही नवीन मीटर बसविण्यात आले नाहीत, वीजबिल कमी करण्यासाठी महावितरण कंपणीचे उंबरठे झिजवावावे लागणार आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते फोन उचलत नाहीत तर पिंपळवंडी येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्याने सांगितले की, नवीन मीटर उपलब्ध नसल्यामुळे मीटर बसविण्यास उशीर झाला आहे. मीटर आल्यावर ते तत्काळ बसविले जातील. ते कधी उपलब्ध होतील हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.आंदोलनाचा इशारामहावितरण कंपनीने वीजबिलांचे रीडिंग घेण्यासाठी ज्या ठेकेदाराला ठेका दिला आहे, त्या ठेकेदाराकडून व्यवस्थित रीडिंग घेतले जात नसल्यामुळे मनमानी पद्धतीने वीजआकारणी केली जात आहे. वीजबिल कमी करण्यास वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे महावितरण कंपणीच्या मनमानी कारभाराला नागरिक कंटाळले असल्यामुळे आता थेट महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.