शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

मेंढपाळांवर आली भटकंतीची वेळ

By admin | Published: May 12, 2017 4:53 AM

इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवालचंदनगर : इंदापूर तालुक्यात दर वर्षी हंगामी पिके शेतकरी घेत होते. त्यामुळे मेंढपाळ तालुक्यात हंगामानुसार आपल्या कुटुंबासह दाखल होत असत. सहा महिने शेतकऱ्यांच्या जमिनीवर मेंढ्या बसवून ज्वारी, पैसे यांच्या मोबदल्यात शेतकरी मेंढपाळांना मिळत असे. मात्र, आंतरपिके घेण्यावर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. मेंढपाळांना जमिनी शिल्लक राहिल्या नाहीत. शेतीच्या आधुनिकीकरणामुळे मेंढपाळांना हजारो मेंढ्या जगवण्यासाठी रस्त्याच्या कडेनेच भटकंती करण्याची वेळ आलेली आहे. ना चारा, ना पाणी. मेंढ्या बसवण्यासाठी शिल्लक जमिनी उपलब्ध नसल्याने रस्त्यावरच आपली पाले ठोकून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे.मेंढपाळ दत्तू रामा ठोंबरे याच्याकडे ६०० मेंढ्या उपलब्ध आहेत. त्यांना घेऊन कुटुंबासह ३ महिन्यांपासून ते बाहेर पडलेले आहेत. तीन महिन्यांत तालुक्यातील एकाही शेतकऱ्याने आपल्या शेतात मेंढ्या बसवल्या नाहीत. त्यामुळे दोन-दोन मेंढ्या विकून आपले कुटुंब जगवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तर, या मेंढ्यांना जगवण्यासाठी तालुक्यात कुठेही जमिनीवर चारा उपलब्ध नाही. दत्तू ठोंबरे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना स्वत:ची शेती असताना त्याच्या जनावरांच्या चारापाण्याची सुविधा म्हणून चारा छावण्या उभरल्या जातात. ज्या मेंढपाळांना गुंठाभर जमिनी नसतात, त्यांना मात्र चारा छावण्या उभारल्या जात नाहीत. शासनाच्या कोणत्याही सुविधा या मेंढपाळांना मिळत नाहीत. भटकंती करणारा हा समाज स्थिर होण्यापासून वंचित राहिला आहे. शासनाने अशा भटकंती करणाऱ्या मेंढपाळांना चारा छावण्यांत समाविष्ट करून घ्यावे, अशी अपेक्षा या मेंढपाळांची आहे.