शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

शिरूर, मुळशीचे वाचले पाणी!

By admin | Published: January 07, 2016 1:40 AM

जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र

पुणे : जिल्ह्यातील भामा-आसखेड व चासकमान या दोनच धरणांतून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९० टीएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने बुधवारी दिला. त्यामुळे शिरूर व मुळशी तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. येथील जनता प्राधिकरणाच्या निर्णयाची वाट पाहत होती. कारण पुन्हा पाणी सोडण्याचा निणर्य प्राधिकरणाने घेतला, तर चासकमान लाभक्षेत्रातील १ हजार हेक्टरवरील शेती धोक्यात येणार होती व मुळशीकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार होता.यापूर्वी चासकमान धरणातून ८९.१२ दलघमी पाणी सोडण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले होते. धरणाची क्षमता ३ टीएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ८९ दलघमी पाणी सोडले, तर चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३० ते ३५ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यावर येथील सिंचनासाठीचे १ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. त्यात धरणातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू होते. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश होता. यामुळे धरणातील पाणीपातळी खालावली होती. जर पूर्वीचा आदेश कायम ठेवला असता, तर पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळाले नसते. पिकं जळून गेली असती. त्यामुळे येथील शेतकरी पाणी सोडू देण्यास विरोध करीत होते. शेती वाया जाणार असल्याने शेतकरी या निर्णयकडे लक्ष ठेवून होते. आज नव्याने निर्णय आला असून, यात धरणातून २०.७० दलघमी पाणी सोडण्यात येणार आहे. यापूर्वी ते ८९.१२ दलघमी होते. म्हणजे ६८.४२ म्हणजे २.३० टीएमसी पाणी वाचले आहे. तसेच कुकडी प्रकल्पातून घोड धरणात सुमारे ३४ दलघमी पाणी सोडण्याचे आदेशही मंगळवारी प्राधिकरणानी दिले आहेत. याचाही फायदा शिरूर तालुक्याला मिळणार आहे. (प्रतिनिधी)