शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेचे नुकसान; मुख्यमंत्री यांनी आघाडीतून बाहेर पडावे', विजय शिवतारे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 7:06 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही बाजूंनी समन्वय साधण्याचा प्रयत्न

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५१ आमदार बाहेर गेले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. त्यांच्याकडून पक्ष संपविण्याचा प्रयत्न होत आहे. आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे गेले पाहिजे. हिंदुत्व भूमिका असलेल्या पक्षासोबत आपण गेले पाहिजे. २०१९ च्या निवडणुकीत पडलेले उमेदवार आणि निवडुन आलेल्या उमेदवारांना ९० लाख ४९ हजार मते मिळाली. ४६ लाख मते निवडून आलेले ही उमेदवारांनी घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकार सोबत राहिल्याने नुकसान होत आहेत. शिवसेना पक्ष आपल्यासाठी महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य आहे, त्यांच्या सज्जनपणाचा फायदा घेतला जात आहे. असे मत पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवतारे म्हणाले की, आम्ही १०० टक्के हिंदुत्वाच्या बाजूने आहोत. मुख्यमंत्री यांनी या चक्रव्यूहातून बाहेर पडावे. शिवसेनेला मतदान केलेल्या मतदारांचे नुकसान होत आहे. आम्ही तुमच्यासोबत राहू, परंतु महाविकास आघाडी सोबत राहणार नाही. एकनाथ शिंदे यांचे ऐकावे, त्याबाबत आम्ही आज मुख्यमंत्री यांना ठराव केलेले पत्र देणार आहोत.

या सर्व घटनांना संजय राऊत जबाबदार

मुख्यमंत्री समन्वयाच्या भूमिकेत असताना राऊत बंडखोरांना आव्हान देत आहेत. त्यांनी शिवसेना बारामतीच्या वलचाळीला नेऊन बांधली गेली आहे. राजकीय स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुरंदर एअरपोर्ट बाबत सर्व परवानगी घेण्यात आलेल्या होत्या. ४ हजार ५०० कोटी रक्कम ची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट साठी सर्वात महत्वाची जागा आहे. परंतू ते दुसरीकडे नेण्याचा घाट घातला जात आहे. राष्ट्रीय बाजार व पुणे बाजार समितीसाठी ५ कोटी रुपये एकर नुसार ४०० एकर जागा मिळत आहे. ती सुद्धा थेऊर कारखानाकडे नेण्याचा घाट घातला आहे. गुंजवडी धरण करून घेतले, त्याच्या कामासाठी निधी पडून आहे. आमचे पाणी बारामतीला पळविले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळVijay Shivtareविजय शिवतारेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी