शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळे शिवसेनेचे नुकसान; मुख्यमंत्री यांनी आघाडीतून बाहेर पडावे', विजय शिवतारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 19:06 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोन्ही बाजूंनी समन्वय साधण्याचा प्रयत्न

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५१ आमदार बाहेर गेले आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यामुळे शिवसेनेचे नुकसान होत आहे. त्यांच्याकडून पक्ष संपविण्याचा प्रयत्न होत आहे. आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे गेले पाहिजे. हिंदुत्व भूमिका असलेल्या पक्षासोबत आपण गेले पाहिजे. २०१९ च्या निवडणुकीत पडलेले उमेदवार आणि निवडुन आलेल्या उमेदवारांना ९० लाख ४९ हजार मते मिळाली. ४६ लाख मते निवडून आलेले ही उमेदवारांनी घेतले आहेत. महाविकास आघाडी सरकार सोबत राहिल्याने नुकसान होत आहेत. शिवसेना पक्ष आपल्यासाठी महत्वाचा आहे. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य आहे, त्यांच्या सज्जनपणाचा फायदा घेतला जात आहे. असे मत पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी व्यक्त केले.

यावेळी शिवतारे म्हणाले की, आम्ही १०० टक्के हिंदुत्वाच्या बाजूने आहोत. मुख्यमंत्री यांनी या चक्रव्यूहातून बाहेर पडावे. शिवसेनेला मतदान केलेल्या मतदारांचे नुकसान होत आहे. आम्ही तुमच्यासोबत राहू, परंतु महाविकास आघाडी सोबत राहणार नाही. एकनाथ शिंदे यांचे ऐकावे, त्याबाबत आम्ही आज मुख्यमंत्री यांना ठराव केलेले पत्र देणार आहोत.

या सर्व घटनांना संजय राऊत जबाबदार

मुख्यमंत्री समन्वयाच्या भूमिकेत असताना राऊत बंडखोरांना आव्हान देत आहेत. त्यांनी शिवसेना बारामतीच्या वलचाळीला नेऊन बांधली गेली आहे. राजकीय स्वार्थासाठी घेतलेला निर्णय नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुरंदर एअरपोर्ट बाबत सर्व परवानगी घेण्यात आलेल्या होत्या. ४ हजार ५०० कोटी रक्कम ची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट साठी सर्वात महत्वाची जागा आहे. परंतू ते दुसरीकडे नेण्याचा घाट घातला जात आहे. राष्ट्रीय बाजार व पुणे बाजार समितीसाठी ५ कोटी रुपये एकर नुसार ४०० एकर जागा मिळत आहे. ती सुद्धा थेऊर कारखानाकडे नेण्याचा घाट घातला आहे. गुंजवडी धरण करून घेतले, त्याच्या कामासाठी निधी पडून आहे. आमचे पाणी बारामतीला पळविले.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळVijay Shivtareविजय शिवतारेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी