शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
2
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
3
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
4
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
5
शेअर बाजाराचा बुल सुस्साट, Sensex ८० हजारांपार; Nifty १९० अंकांनी वधारला; IT स्टॉक्समध्ये खरेदी
6
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
7
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
9
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
10
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
11
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
12
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
13
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
14
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
15
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
16
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
17
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
18
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
19
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
20
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी

‘शोले’चा शेवटही झाला होता ‘सेन्सॉर’; रमेश सिप्पी यांचा ‘पिफ’मध्ये गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 16:40 IST

हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत ‘शोले’ चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले, असा गौप्यस्फोट करीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली.

ठळक मुद्देसेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरूद्ध दिग्दर्शक नक्कीच लढा देऊ शकतात : रमेश सिप्पी''‘पॅशन'’ हा चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक'

पुणे :  ‘शोले’ चित्रपटाचा शेवट एका वेगळ्या दृष्टीकोनातून केला होता. सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहिल्यानंतर खूपच हिंसा दाखविण्यात आली आहे. हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले. त्यांनी सूचविलेल्या शेवटाने आम्ही फारसे आनंदी नव्हतो.. पण आम्हाला ते करावे लागले...असा गौप्यस्फोट करीत ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी करीत ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली.पिफमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पिफ फोरममधील राज कपूर पॅव्हेलियन मंचाचे उद्घाटन रणधीर कपूर, राजीव कपूर, ऋषी कपूर तसेच रमेश सिप्पी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पिफचे संयोजक डॉ. जब्बार पटेल यांनी सिप्पी यांची मुलाखत घेतली, त्या वेळी ते बोलत होते. भारतीय चित्रपटसृष्टीत ‘शोले’ या चित्रपटाने इतिहास रचत रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. आजही या चित्रपटाचे रसिकमनावर गारूड कायम आहे. ‘अरे ओ सांबा कितने आदमी थे, ये हाथ मुझे दे दे ठाकूर’ हे गब्बरचे संवाद त्याच अमजद खान यांच्या खर्ज्यातील आवाजात सादर करीत शोलेची आठवण ताजी केली. सलीम-जावेद यांनी लिहिलेले गब्बरच्या तोंडचे संवाद पाहिले तर खूप साधे आहेत पण त्याला काहीसा उत्तर प्रदेशीय भाषा आणि लय यामुळे हे संवाद खूपच प्रभावी वाटले आहेत. कथानक, वातावरण, ड्रामा याला कुठेही धक्का न लावताही दिग्दर्शकाला अनेक वेगळे प्रयोग चित्रपटामधून करता येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे  ‘शोले’. जे प्रेक्षकांनी पूर्वी कधी पाहिले नाही ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चित्रपटात दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु एका वेगळ्या दृष्टीकोनातून बनविलेल्या चित्रपटाचा शेवट बदलला जाणे ही दिग्दर्शकासाठी निराशेची गोष्ट असते. त्याचा सामना मला करावा लागला आहे. त्यामुळे सेन्सॉरशीप लादली जाण्याची बाब काही नवीन नाही. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाविरूद्ध दिग्दर्शक नक्कीच लढा देऊ शकतात. मात्र एक गोष्ट नक्कीच आहे की चित्रपटातून हिंसेचे उदात्तीकरण करण्यात आलेले सगळेच चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरतातच असेही नाही. पण दिग्दर्शकाने आपले काम चोखपणे करीत राहाणे हाच त्यावरचा उत्तम पर्याय आहे, असा सल्ला त्यांनी नवोदित दिग्दर्शकांना दिला. मला चित्रपट बनविण्याची कधीच भीती वाटत नाही. दिग्दर्शकाला चित्रपटामधून जे मांडायचे आहे ते त्याने मांडले पाहिजे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ‘पॅशन’ हा चित्रपट निर्मितीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. मी स्वत: चित्रपट बनविण्याचे रितसर प्रशिक्षण घेतलेले नाही. लहानपणी वडिलांच्या चित्रपट सेटवर जायचो. पडद्यामागे घडणाऱ्या गोष्टी, लाईटस, कॅमेरा, अभिनय या सर्व गोष्टा जवळून अनुभवल्या. याच वातावरणात लहानाचा मोठा झालो. पॅशन असल्याशिवाय चित्रपट निर्मितीचा भाग होता येणे शक्य नाही. त्याकाळाच्या तुलनेत आज नवीन पिढीला चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रशिक्षण घेण्याची अनेक व्यासपीठ खुली झाली आहेत. चित्रपट म्हणजे कथानक सांगण्याचा प्रकार असतो. ते कथानक प्रेक्षकांना कसे भावेल त्यासाठी त्यामध्ये कोणत्या गोष्टींचा वापर करता येईल तो कसा घडविता येईल या गोष्टींचे आकलन प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहजसोप्या पद्धतीने होऊ शकते असे सांगत प्रशिक्षण महत्वपूर्ण असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

टॅग्स :PIFFपीफJabbar Patelजब्बार पटेल Puneपुणे