शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कायम चर्चेत असणारा चेहरा : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 16:56 IST

'अजित अनंतराव पवार' या नावाला गेल्या २३ नोव्हेंबरपासून विशेष वलय आला असले तरी अजित पवार हे कायम चर्चेत असतात. ते मंत्री असोत किंवा नसोत पण त्यांची चर्चा राजकीय वलयांकित आहे आणि राहील.

पुणे : 'अजित अनंतराव पवार' या नावाला गेल्या २३ नोव्हेंबरपासून विशेष वलय आला असले तरी अजित पवार हे कायम चर्चेत असतात. ते मंत्री असोत किंवा नसोत पण त्यांची चर्चा राजकीय वलयांकित आहे आणि राहील. अजित पवारांना कार्यकर्तेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र 'दादा' म्हणूनच ओळखतो. त्यांच्यावर टीका करणारे विरोधकही 'दादा' संबोधूनच टीका करतात ते विशेष. बारामती  विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा निवडून आलेले पवार यांना यावेळी राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे.  

२०१९साली तर मुलगा पार्थ पवार यांची लोकसभेची उमेदवारी, आमदारकीचा राजीनामा आणि त्यावरही कळस म्हणून थेट भाजपसोबत घेतलेली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ या तीन घटनांनी अजित पवार यांना राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही माध्यमांमध्ये झळकवलं  यात शंका नाही, १९९१सालापासून सुरु झालेली त्यांची राजकीय कारकीर्द ही कायम यशस्वी याच विश्लेषणाने ओळखली जाते. वेळ पाळण्यात अत्यंत पक्के, स्पष्टवक्ते, कोणतेही आढेवेढे न घेता आपले ठाम मत मांडणारे, मनस्वी आणि काहीसे संवेदनशील असे त्यांचे मिश्र व्यक्तिमत्व आहे. बहुतांशवेळा  'आज या ठिकाणी' म्हणत भाषणाची सुरुवात करणारे दादा कार्यकर्त्यांमध्येही प्रसिद्ध आहेत ते त्यांच्या याच व्यक्तिमत्त्वामुळेच. अस्सल ग्रामीण ढंगात भाषण करताना पवार कोणत्या नेत्याची टोपी उडवलतील यांची शंका नसते, त्यामुळे त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसणारेही सावध बसतात असं गंमतीने सांगितलं जातं.

कारकीर्द म्हणून बघायची झाली तर १९८२ साली छत्रपती कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९१ मध्ये ते बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. मात्र, शरद पवार यांच्यासाठी त्यांनी राजीनामा दिला. १९९१ मध्ये राज्य मंत्री म्हणून त्यांचा मंत्रीमंडळात पहिल्यांदा समावेश झाला. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉँग्रेस मंत्रीमंडळात ते पाटबंधारे मंत्री झाले. त्यानंतर सलग १५ वर्षे ग्रामविकास, फलोत्पान, अर्थ व नियोजन आदी पदे त्यांनी भूषविली. २०१२ ते २०१४ ते उपमुख्यमंत्री होते. पुणे जिल्हा सहकारी बॅँकेचे ते १६ वर्षे संचालक होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँकेचे १९९८ ते १९९९ अध्यक्ष होते. याशिवाय कबड्डी, खो-खो, ऑलिम्पिक संघटनेचे राज्य अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. विविध शिक्षणसंस्थांवरही त्यांनी काम केले आहे. २००४ ते २०१४ ते पुण्याचे पालक मंत्री होते. पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका त्यांनी एकेकाळी अक्षरशः एकहाती चालवले होते. 

 देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ७९ तास चाललेल्या सरकारमध्ये ते जरी सहभागी झाले असले तरी त्यांचे राष्ट्रवादीतले आणि कार्यकर्त्यांच्या मनातले स्थान आजही तेवढेच आहे हे वारंवार दिसून आले आहे. अगदी परवा म्हणजे शनिवारी पुण्यात कालवा समितीच्या बैठकीत 'अजित पवार इज बॅक' हे दिसून आले. त्यामुळे राज्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्यात पालकमंत्री म्हणून त्यांची प्रशासकीय कामे आणि विकासातली  'दादागिरी' पुन्हा दिसून यावी हीच जनतेची अपेक्षा आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार