शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर कारला टोलमाफी
2
"सरकारला उशिराने सुबुद्धी, निर्णय निवडणुकीपुरता न ठेवता..."; मुंबई टोलमाफीवर राज ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया
3
“राज्यात एक फूल दोन हाफ सिंघम, मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करावा”; संजय राऊतांचा हल्लाबोल
4
उद्यापासून आचारसंहिता लागणार? महायुती सरकारची आज शेवटची मंत्रिमंडळ बैठक!
5
पाकिस्तान जिंकू रे देवा, पण...; टीम इंडियाचं सेमीफायनलचं तिकीट 'शेजाऱ्यांच्या' हाती, पाहा गणित
6
बनावट नोटा बनवण्याची ट्रिक सांगून तरुणाला घातला ५.५ लाखांचा गंडा; काय आहे हे प्रकरण?
7
गँगवॉर, मर्डर, एन्काउंटर : सावधान मुंबई बदलत आहे
8
Hyundai Motor IPO मध्ये 'हे' गुंतवणूकदार आजपासून करू शकतात गुंतवणूक, ग्रे मार्केटमध्ये स्टॉक आपटला
9
Harmanpreet Kaur एकटी लढली; पण शेवटी तिची एक चूक नडली!
10
मुंबई-हावडा मेल टायमर बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव स्थानकावर २ तास तपासणी!
11
Baba Siddique : जेलमध्ये सुपारी, ४ आठवडे रेकी, ३ शूटर, ६ गोळ्या...; सिद्दिकी हत्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे
12
Video - "गोठ्यात झोपल्याने कॅन्सर बरा होतो, ब्लड प्रेशरही कंट्रोल"; भाजपा नेत्याचा अजब दावा
13
“भाजपातून ८० टक्के लोक आमच्याकडे”; शरद पवारांच्या विधानावर महायुतीतील मंत्र्यांचा पलटवार
14
गुजरातमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात सापडले ड्रग्ज; ५००० कोटी रुपयांचे कोकेन जप्त
15
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; न्यूयॉर्कला जाणारे विमान दिल्लीत उतरविले
16
काय आहे PM Internship Scheme? Reliance सह 'या' बड्या कंपन्यांमध्ये 'इंटर्न' होता येणार!
17
रामलीला ऐन रंगात आलेली! तेवढ्यात 'राम व रावण' खरोखरच एकमेकांना भिडले, लाथाबुक्क्या घालू लागले
18
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
19
सावधान! Amazon कडून 'हॅक' झालेला मोबाईल आला, महिलेचा डेटा हॅकर्सकडे गेला; पुढे काय घडलं?
20
भीषण! गाझामधील शाळेवर इस्रायलचा एअर स्ट्राईक; लहान मुलांसह २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी

साधेपणाने विवाह केल्याने पैशांची होतेय मोठी बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:11 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आपत्तीमुळे मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना आपत्तीमुळे मार्च २०२० च्या शेवटच्या आठवड्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व कोरोना संसर्गाच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले. याचा मोठा परिणाम लग्नसमारंभ घटण्यावर झाला असला तरी, गेल्या १४ महिन्यांच्या काळात काहींनी साधेपणाने लग्नसमारंभ करण्यास मोठी पसंती दिली.

मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत व साधेपणाने लग्नसमारंभ केल्यास लाखो रुपयांची बचत होतीच; पण हीच लाखो रुपयांची रक्कम त्या दाम्पत्याच्या भावी आयुष्यासाठी एक ठेव म्हणूनही जमा करता आल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

विवाह नोंदणी संस्थेकडे असलेल्या नोंदणीनुसार मार्च, २०२० पासून डिसेंबर, २०२० पर्यंत शहरात ३८०० तर जानेवारी २०२१ ते मार्च, २०२१ पर्यंत २ हजार ३१ विवाह नोंदणी पद्धतीने झाले आहेत़

दरम्यान पुणे महापालिकेकडे साधारणत: दरवर्षी पाच हजारांच्या आसपास विवाह नोंदणी प्रमाणपत्रे दिली जातात; परंतु या दोन वर्षांच्या काळात अनेकांनी अद्यापही विवाह नोंदणी केली नसल्याने, शहरात निश्चित किती विवाह झाले याची आकडेवारी स्पष्ट होत नाही. त्यातच अनेक क्षेत्रीय कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांमधील कर्मचारी वर्ग हा कोविड-१९ च्या कामात व्यस्त असल्याने हे नोंदणीचे कामही वर्षभर थांबले गेले आहे. तर जी नोंदणी झाली आहे, तिचे प्रमाणही खूपच कमी आहे.

---------------

चौकट १

शहरातील जन्म-मृत्यू नोंदणीची जानेवारी २०१९ पासूनची आकडेवारी पाहता जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कोरोना आपत्तीतही जास्तच राहिला आहे. सन २०२० मध्ये वर्षभरात ५० हजार ५४४ जणांचा जन्म झाल्याची नोंद आहे. तर याच काळात ३८ हजार १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे साधारणत: १२ हजाराने मृत्यूपेक्षा जन्माची संख्या ही जास्तच आहे़

----------------

वर्ष जन्म मृत्यू

२०१९ ५२,६६९ ३२,३५३

२०२० ५०,५४४ ३८,१९४

--------------------

चौकट १

कोरोना आपत्तीमुळे सप्टेंबर, २०२० अखेर रखडलेले लग्नसमारंभ कोरोना संसर्ग ओसरल्याने, नोव्हेंबर, २०२० पासून पुन्हा सुरू झाले. डिसेंबर, २०२०, जानेवारी ते फेब्रवारी २०२१ पर्यंत लग्न समारंभांना शासनाने १०० जणांच्या उपस्थितीचे बंधनही कायम ठेवले होते; परंतु ते अनेकांनी न पाळल्याने व त्यातच मार्च, २०२१ पासून पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याने, लग्न समारंभांवर मोठ्या प्रमाणात बंधने आली. २५ लोकांच्या उपस्थितीतच लग्नसमारंभ पार पाडण्याचा आदेश शासनाने दिला़. परिणामी या काळात होणारे नियोजित लग्नसमारंभ पुढे ढकलली गेली आहे.

----------------------------------