शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:12 AM

अभिजित कोळपे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ...

अभिजित कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे. चालू घडामोडींना (करंट इव्हेंन्टस) जास्त महत्त्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रथम परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. विविध विषयांच्या घडामोडींची सातत्याने नोंद ठेवणे आवश्यक आहे. पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रांचे वाचन करत असताना आता त्याचबरोबर आता इंटरनेटचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण अनेक क्लास ऑनलाइन माध्यमातून होत आहे. ते सर्व इंटनेटवर उपलब्ध आहे. त्याचा वापर करत विविध विषयांच्या घडामोडींच्या सातत्याने नोंदी ठेवाव्यात. परीक्षेमध्ये त्याचा खूपच फायदा होतो, असा सल्ला केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक पदावर कार्यरत असलेले डाॅ. मोतीलाल शेटे देतात.

यूपीएससीच्या परीक्षामध्ये दोनदा निवड झालेले आणि एमबीबीएस असलेले डॉ. मोतीलाल शेटे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फे उदगाव येथील आहेत. सन २०१२ साली पहिल्यांदा भारतीय रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस (आयआरटीएस) मध्ये निवड झाली. त्यांनतर सन २०१४ मध्ये भारतीय आयकर विभागात (आयआरएस-वस्तू व सेवा कर) निवड झाली आहे. सुरुवातीचे दोन वर्षे औरंगाबाद येथे नेमणूक झाली होती. तर आता केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागात पुणे येथे उपसंचालक म्हणून कार्यरत आहे. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षण मूळ गावी तसेच इस्लामपूर येथे झाले आहे. आई गृहिणी तर वडील स्टेट बॅंकेत नोकरीला होते. यूपीएससीच्या तयारीसाठी घरातून पाठिंबा होता. त्यामुळे अभ्यास करताना पूर्ण फोकसने अभ्यास केल्यामुळे लवकर यशस्वी झालो, असे डॉ. शेटे सांगतात.

परीक्षा काय प्रकारची आहे. हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला मी खासगी क्लास लावला होता. त्यानंतर मी पूर्णत: वैयक्तिक घरूनच अभ्यास केला. चार-पाच मित्रांचा आमचा चांगला ग्रुप केला होता. वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सातत्याने चर्चा करायचो. त्यामुळे अनेक अवघड विषय, संकल्पना (कन्सेप्ट) समजण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी गटचर्चा (ग्रुप स्टडी) अत्यंत फायदेशीर झाली आहे. एकएकट्याने अभ्यास करताना परीक्षेत काय विचारले जाते, काय वाचायला पाहिजे, यावरचा फोकस हलण्याची, बदलण्याची शक्यता बऱ्याच वेळा चुकत जाते. अनेक विद्यार्थी अनावश्यक असलेली पुस्तके वाचत बसतात. त्यात प्रचंड वेळ, वर्षे वाया जातात. त्यामुळे यूपीएससीच्या परीक्षेत नेमके काय विचारले जात आहे, हे समजणे आणि समजून घेणे फारच आवश्यक आहे.

डॉ. शेटे सांगतात, की पूर्व परीक्षा ही वैकल्पिक प्रकारची असल्याने त्यादृष्टीने नियमितपणे वर्तमानपत्र वाचन करत नोट्स काढणे आवश्यक आहे. परीक्षेच्या काळात या नोट्सचा खूप फायदा होतो. मुख्य परीक्षेची मांडणी ही विश्लेषणात्मक असल्याने लेखन सराव फार गरजेचा आहे. मुलाखतीची तयारी करताना सुरुवातीला दोन-तीन क्लासमध्ये मी मुलाखत दिली होती. मात्र, मित्रांबरोबर गटचर्चा करताना सातत्याने मुलाखतीचा सराव केला. मित्र वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न काढायचे. प्रत्येक मुलाखतीच्या वेळी सराव करताना मित्र अनेक त्रुटी काढायचे. त्यावर मग मी जाणीवपूर्वक सुधारणा केल्या. त्याचा यूपीएससीच्या अंतिम परीक्षेच्या वेळी खूप फायदा झाला आहे.

फोटो : डॉ. मोतीलाल शेटे