शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

एकपात्री नारी, घेईल भरारी!

By admin | Published: September 24, 2015 3:06 AM

पुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी एकपात्री, स्टँडअप कॉमेडी ही कलाक्षेत्रे महिला कलाकारांनीही पादाक्रांत केली आहेत. लेखन, दिग्दर्शन, संहिता, सादरीकरण अशा सर्व जबाबदाऱ्यांची

प्रज्ञा केळकर-सिंग,पुणेपुरुषांची मक्तेदारी मानली जाणारी एकपात्री, स्टँडअप कॉमेडी ही कलाक्षेत्रे महिला कलाकारांनीही पादाक्रांत केली आहेत. लेखन, दिग्दर्शन, संहिता, सादरीकरण अशा सर्व जबाबदाऱ्यांची धुरा सांभाळत त्या ‘वन वूमन शो’तून स्वत:ला सिद्ध करीत आहेत. विविध प्रयोगांच्या निमित्ताने त्यांना परगावी, परराज्यांत, परदेशांतही जाण्याची संधी मिळते. अशा वेळी धाडस, आत्मविश्वास, क्षमता, कौशल्य आणि दर्जा यांच्या सोबतीने त्या स्वत:चा ठसा उमटवतात. संघर्षाकडे, आव्हानांकडे संधी म्हणून पाहत कलाकारांनी सकारात्मक ऊर्जा निर्माण करीत उदयोन्मुख कलाकारांसाठी आदर्श निर्माण करून दिला आहे. साठच्या दशकात मराठी नाटकांमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. एकपात्री नाटकाचा जन्म याच काळातला. महिला कलाकारांना एकपात्री प्रयोगाच्या निमित्ताने नानाविध अनुभव येतात. मानधन, आयोजक, प्रेक्षक, प्रवास, सुरक्षितता या सर्वच निकषांवर त्यांचा कस लागतो. एकपात्री कला परिषदेच्या अध्यक्षा चैत्राली माजगावकर म्हणाल्या, ‘‘सध्या या क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे खंबीरपणा, बिनधास्तपणा, धाडस आणि कलेवर प्रेम असणारी महिलाच यात पाय रोवून उभी राहू शकते. चार-पाच विनोद, कविता, शायरी एकत्र करून त्यांचे सादरीकरण केले म्हणजे एकपात्री सादर केले, असे होऊ शकत नाही. त्यासाठी साहित्याचा अभ्यास, लेखनाचे कौशल्य, सकस संहिता निर्माण करण्याची क्षमता असावी लागते. तरच, एकपात्रीच्या क्षेत्रात टिकाव लागू शकतो. एकपात्री प्रयोगांसाठी बाहेरगावी गेल्यावर जेवण, स्वच्छतागृह, कपडे बदलण्यासाठी वेगळी खोली अशा गोष्टींसाठीही बऱ्याचदा झगडावे लागते.’’‘चर्पट मंजिरी’ फेम मंजिरी धामणकर यांनी ‘समाधानकारक धन मिळाले नाही तरी मान मात्र मिळतो,’ असे सांगितले. ग्रामीण भागातील लोकांना एका महिलेचा कार्यक्रम पचनी पडत नाही, अशा वेळी प्रसंगावधान राखावे लागते, असे त्यांनी सांगितले.‘हास्यवर्षा’, ‘क कवितेचा’ हे कार्यक्रम करणाऱ्या डॉ. मृण्मयी भजक म्हणाल्या, ‘‘महिलांना विनोदातलं काय कळतं? हा समज लोकांच्या मनात अद्यापही बऱ्यापैकी टिकून आहे. त्यामुळे प्रेक्षकवर्ग पाहून त्याप्रमाणे अचानक कार्यक्रमात बदल करावे लागतात आणि त्यासाठी सखोल अभ्यास करावा लागतो.’’ ‘अस्सा नवरा’, ‘एक दिवस असाही’ फेम कल्पना देशपांडे म्हणाल्या, ‘‘बऱ्याचदा कपडे बदलण्यासाठी देण्यात येणाऱ्या खोलीला काचा नसतात. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असते. अशा वेळी संकोच न करता आयोजकांकडे पर्यायी व्यवस्था मागावी लागते’’ ‘ओंजळीतील फुले’, ‘जरा विसावू कवितेपाशी’ असे कवितांचे कार्यक्रम करणाऱ्या शांभवी बोधे म्हणाल्या, ‘‘कविता म्हटली, नाकं मुरडली जातात. कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसादही समाधानकारक नसतो. पण, एकदा लोकांना कार्यक्रमाचा दर्जा, वेगळेपण कळलं, की फारशी अडचण येत नाहीत.’’