शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

...म्हणून मोदी सरकारनं कोरोना लसींच्या दोन डोसमध्ये ८४ दिवसांच्या अंतराचा फतवा काढला..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 20:45 IST

कोरोना लसीचा तिसरा डोसही घ्यायला हवा; मी स्वत: घेतला, सायरस पूनावाला यांचं मोठं विधान

पुणे : कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या दोन डोसमधील अंतर दोन महिने असले पाहिजे. मात्र, लस उपलब्ध नसल्यामुळे मोदी सरकारने तीन महिन्यांच्या अंतराचा फतवा काढला आहे अशा शब्दात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सायरस पुनावाला यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोरोना होऊन गेलेल्यांनी सहा महिन्यांनी लस घ्यावी. ज्यांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही, त्यांना प्राधान्य मिळाले पाहिजे असेही पुनावाला म्हणाले.

पुण्यातील एका कार्यक्रमानंतर डॉ. सायरस पुनावाला यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुनावाला म्हणाले,कोव्हिशिल्ड लस घेतल्यावर निर्माण झालेल्या अँटीबॉडी सहा महिन्यांनी कमी होऊ लागतात. म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे. 

सिरम इन्स्टिट्यूटतर्फे इतर सर्व लसींचे मिळून १५ कोटींचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे, केवळ कोव्हिशिल्डच्या १५ कोटी लसींचे उत्पादन एका महिन्यात केले जात आहे. नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी, यासाठी आम्ही कोरोनावरील लसीला प्राधान्य देत आहोत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अदर पुनावाला केवळ उन्हाळी सुट्टयांसाठी परदेशी गेले होते. धमक्या आल्यामुळे देश सोडावा लागला, असा विपर्यास करण्यात आला असेही पुनावाला यांनी नमूद केले.

कोव्हिशिल्ड लस घेतल्यावर निर्माण झालेल्या अँटीबॉडी सहा महिन्यांनी कमी होऊ लागतात. म्हणून मी तिसरा डोस घेतला आहे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचा-यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे. सिरम इन्स्टिट्यूटमधील सात-आठ हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरा डोस दिला आहे. दुसरा डोस घेऊन सहा महिने झाल्यावर तिसरा बुस्टर घेतला पाहिजे असेही महत्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे.

तिस-या लाटेची तीव्रता कमीहर्ड इम्युुनिटी आणि लसीकरणाच्या माध्यमातूनच साथीवर नियंत्रण मिळवता येईल. कोरोनाची साथ जोपर्यंत जाणार नाही, तोवर लस घ्यावी लागणार आहे. तिसरी लाट तितकीशी  तीव्र नसेल, कारण अनेकांना कोरोना होऊन गेला आणि  अनेकांचे लसीकरणही झाले आहे. पुण्यात लसींचा तुटवडा आहे, त्यामुळे पुण्याला जास्त लस द्या, असे आम्ही मोदी सरकारला सांगितले. मात्र सरकार याबद्दल उत्तर द्यायला तयार नाही. आम्हाला वाटेल ते आम्ही करु, असे त्यांनी सांगितले आहे.

कॉकटेल डोस परिणामकारक नाहीकॉकटेल लसीला माझा विरोध आहे. दोन वेगवेगळया लसींचे डोस दिले आणि परिणामकारकता चांगली नसल्यास लस उत्पादक कंपन्या एकमेकांवर आरोप करतील. हजारो लोकांच्या चाचण्यांमध्ये कॉकटेलची उपयुक्तता सिध्द झालेली नाही. कॉकटेल लसीला पूर्णपणे मान्यता मिळेल, असे वाटत नाही. कारण, तो खूप जोखमीचा आणि गुंतागुंतीचा निर्णय नसेल.

लॉकडाऊनची गरज नाही... लॉकडाऊनची गरज आहे, असे मला वाटत नाही. हर्ड इम्यनिटीमुळे लोकांना संरक्षण मिळू शकेल. कोरोनाचा मृत्यूदरही कमी आहे. जे रुग्ण वेळेत रुग्णालयात गेले नाहीत, दुखणे अंगावर काढले, ज्यांना उपचार मिळाले नाहीत, अशा रुग्णांना कोरोनामुळे मृत्यू झाला. वेळीच लक्षणे ओळखून डॉक्टरांकडून उपचार घेऊन अनेक रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेCentral Governmentकेंद्र सरकारCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या