शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

महिला अधिकाऱ्यांची समाजोपयोगी संवेदनशीलता

By admin | Published: October 15, 2015 1:11 AM

महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना

पुणे : महिलांमध्ये नैसर्गिकरीत्याच असलेल्या संवेदनशीलतेचा अधिकारीपदावर काम करताना समाजासाठी अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विविध योजना राबविताना, एखादा गंभीर प्रसंग निर्माण झाल्यावर महिला अधिकारी कार्यालय अथवा फिल्डवर अधिक सक्षमपणे काम करतात. त्यामुळे महिलांनी स्वत:ला सिद्ध केल्यानंतर कोणत्या पदावर आहे, याला महत्त्व राहत नाही, असे मत महिला शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांनी येथे व्यक्त केले.नवरात्रोत्सवानिमित्त ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘स्त्रीशक्तीचा जागर’ या उपक्रमांतर्गत बुधवारी महसूल विभाग, पुणे महानगरपालिका, जीवन प्राधिकरण, कोषागार विभागातील महिला अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील आव्हाने, पुरुष मानसिकतेत होत असलेला बदल, समाजात काम करताना येणाऱ्या अडचणी, अधिकारीपदावर असताना कार्यालय आणि घर या जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी कसरत आणि या दोन्ही ठिकाणी स्वत:ला सुपरवुमन म्हणून सिद्ध करण्याची धडपड या विषयांवर सर्वच महिला अधिकाऱ्यांनी मनमोकळेपणे आपली मते मांडली. ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी स्वागत केले. अनेकदा क्षमता असूनही ‘की’ पोस्टवर डावलले जाणे, बदल्यांमुळे कुटुंबाची हेळसांड याचबरोबर खासगीच्या तुलनेत असलेले सुरक्षित वातावरण, वरिष्ठ अधिकारी व पुरुष कर्मचाऱ्यांकडून मिळत असलेला पाठिंबा, समाजाचा बदलता दृष्टिकोन यामुळे शिक्षक व डॉक्टर या चौकटीच्या बाहेर पडून सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे सकारात्मक मत महिला अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.स्त्री-पुरुष समानतेपेक्षा समाजाच्या मानसिकतेत बदलाची गरज आहे. कार्यालयामध्ये एक कार्यक्षम व सक्षम अधिकारी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे अन् दुसरीकडे गृहदक्ष स्त्रीची जबाबदारी देखील निभावताना अनेकदा महिला अधिकाऱ्यांची फरफट होते. एकाच वेळी विविध पातळ्यांवर ‘ती’ लढत असल्याने अनेक वेळा तिची मानसिक व शारीरिक घुसमट होते.- वैशाली आवटे, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विशाखा समित्यांमुळे महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत झाली आहे. कार्यालयामध्ये पुरुष सहकाऱ्याकडून काही त्रास झाल्यावर तक्रार करण्यासाठी कोणताही फोरम नव्हता; पण विशाखा समित्यामुळे आता किमान तक्रार करण्यासाठी महिला पुढे येऊ लागल्या आहेत. समितीकडे तक्रार आल्यानंतर कारवाई होते हे कळल्यानेच महिलांची छेडछाड कमी झाली आहे.- उल्का कळसकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी (मनपा)