शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
5
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
8
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
9
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
10
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
11
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
12
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
13
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
14
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
15
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
16
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
17
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
18
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
19
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

सोलापूरसाठी नदीत सोडलेले पाणीही जाऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 4:10 AM

कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून ...

कळस : उजनीतून इंदापूरला दिलेल्या पाच टीएमसी पाण्याला सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी विरोध केल्याने वातावरण पेटले आहे. आता सोलापूरलाही ऑक्टोबरनंतर धरणातून पाणीची तरतूद नसल्याने एक थेंबही जाऊ दिला जाणार नाही. सध्या नदीतून देण्यात आलेले पाणीही बंद पाडण्यात येईल, असा इशारा इंदापूर शेतकरी कृति समितीने दिला आहे.

कळस (ता. इंदापूर) येथे चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. उजनीतून इंदापूरच्या अवर्षणग्रस्त भागाला देण्यात येणारे पाणी हे आमच्या हक्काचे आहे. त्यास सोलापूरमधून होणारा विरोध हे राजकीय द्वेषापोटी रचलेले षडयंत्र आहे. उजनी धरणामुळे तालुक्यातील विस्थापित झालेल्या लोकांना पाणी मिळत नाही. मात्र, सोलापूरला ऑक्टोबरनंतर अनधिकृतपणे पाणी दिले जाते, ही बाब नियमबाह्य आहे. सध्या सोलापूरला नदीतून देण्यात येणारे पाणीही बंद पाडण्यात येणार आहे. सोलापूरकरांनी आमची खोडी काढली आहे, त्यामुळे आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे रास्ता रोको आंदोलन केले. संतप्त शेतकऱ्यांनी इंदापूरच्या पाण्यास विरोध करणाऱ्यांचा जोडे मारून व मुंडण करून निषेध केला. सणसर येथेही शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय आंदोलन केले. वडापुरी (ता. इंदापूर) येथील इंदापूर-बावडा रस्त्यावर शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन अर्धा तास रास्ता शासनाने फेरविचार करावा, अन्यथा जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे अभिजित तांबीले यांनी सांगितले. कळंबमध्ये पाणी रद्दच्या आदेशाचा काळ्या फिती बांधून निषेध करत बोंबाबोंब आंदोलन करून तीव्र आंदोलन पुकारले आहे.