शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

सोनपावलांनी आली गौराई; घरोघरी पंचपक्वानांचा नैवेद्य

By admin | Published: September 21, 2015 4:16 AM

गणपतीच्या घरी माहेरवाशीण म्हणून बहिणी तीन दिवस येतात. ‘गौराई आली सोन्याच्या पावली’ असे म्हणत तिचे स्वागत केले जाते.

पुणे : गणपतीच्या घरी माहेरवाशीण म्हणून बहिणी तीन दिवस येतात. ‘गौराई आली सोन्याच्या पावली’ असे म्हणत तिचे स्वागत केले जाते. पहिल्या दिवशी तिला भाजीभाकरीचा नैवैद्य दाखवतात. लाडू, चिवडा, करंजी असे फराळाचे पदार्थ करून तिचे कोडकौतुक केले जाते. गणपतीबरोबरच तिची मनोभावे आरती केली जाते. भाद्रपद षष्ठी ही गौरी म्हणजेच महालक्ष्मी बसविण्याची तिथी असते. दुसऱ्या दिवशी गौरीजेवण. म्हणजेच १५ भाज्या, विविध कोशिंबिरी आणि गोडधोडाचे जेवण. यातही पुरणपोळीच्या नैवेद्याला विशेष महत्त्व असते. भाद्रपद महिन्यात शेती पिकांनी फुललेली असल्याने गौरीला वेगवेगळी फुले आणि पत्री वाहण्याची प्रथा आहे. यात केवडा, दवणा, शमी, कमळफूल याचा समावेश असतो. गौरी जेवणाच्या दिवशी संध्याकाळी नातेवाईक, आप्तेष्ट यांना गौरीच्या हळदी-कुंकवासाठी आमंत्रण दिले जाते. त्यानिमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. मग तिसऱ्या दिवशी या गौरी सर्वांचे मन प्रसन्न करून गणपतीसोबत निरोप घेतात. या दिवशी दहीभात आणि खीर याचा नैवेद्य असतो.