शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पिचकाऱ्या 'पंटर्स'मुळे शहराच्या साैंदर्यावर डाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 17:28 IST

स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुण्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित असताना काही समाजकंटक त्यावर बाेळा फिरवत आहेत.

- राहुल गायकवाड पुणे : स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुणे शहराने प्रथम क्रमांक मिळवावा यासाठी पुणे महापालिकेकडून विविध उपक्रम राबविण्यात आले. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई असाे की दुभाजकावर करण्यात आलेली रंगरंगाेटी. सार्वजनिक भिंतींवर पुण्यातील महत्त्वाच्या वास्तूंची चित्रे सुद्धा रेखाटण्यात आली. अशी सगळी पाऊले महापालिककेडून उचलली जात असताना काही समाजकंटक यावर बाेळा फिरवत आहेत. काही मिनिटापूर्वी रंगवलेले दुभाजक पुन्हा पानपिचकाऱ्यांनी लाल रंगाने रंगविण्याची ''किमया'' या समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शहर जरी स्वच्छ हाेत असलं तरी ''अस्वच्छ'' मने ''स्वच्छ'' हाेणार का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. 

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात पुणे शहराचा क्रमांक बराच मागे गेल्याने यंदा विशेष माेहिम पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात आली. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर तसेच थुंकणाऱ्यांवर दंडरुपी कारवाई करण्यात आली. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्ते स्वच्छ करुन घेतले. त्याचबराेबर दुभाजक, सार्वजनिक भिंती यांच्यावर रंगरंगाेटी करण्यात आली. शहरातील अनेक भिंतींवर पुण्याचे चित्ररुपी दर्शन रेखाटण्यात आले हाेते. तर दुसरीकडे दुभाजक पुन्हा एकदा रंगविण्यात आले. परंतु काही समाजकंटकांनी या चित्रांवर, तसेच दुभाजकांवर थुंकून ते लाल करुन टाकले. त्यामुळे रंगकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची तसेच महापालिकेची मेहनत वाया गेल्याचे चित्र आहे. 

चित्ररुपी पुणे सार्वजनिक भिंतींवर रेखाटणारे दीपक चांदणे म्हणाले, आम्ही चित्र रेखाटल्यानंतर तसेच दुभाजक रंगविल्यानंतर काही क्षणातच नागरिकांकडून त्यावर थुंकले जाते. अनेकदा तर लाेक आम्ही काम करत असताना आमच्या अंगावर देखील थुंकले आहेत. या सर्व प्रकारामुळे मनाला वेदना हाेतात. आपली कलाकृती काही मिनिटात खराब हाेताना पाहताना अतिव दुःख हाेते. नागरिकांनी भिंतींवर, दुभाजकांवर न थुंकल्यास शहर सुंदर राहण्यास मदत हाेणार आहे. 

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर माेळक म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षणासाठी विविध उपक्रम महापालिकेकडून राबविण्यात आले. अनेकदा नागरिक रंगविलेल्या भिंतींवर, दुभाजकांवर पानमसाला, गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारतात. ही अत्यंत चुकीची गाेष्ट आहे. शहराला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. लाेकांना पालिकेकडून दंड केला जाताे परंतु लाेकांमध्ये जागृती हाेणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी शहराचे आराेग्य चांगले राखण्यासाठी तसेच शहराला सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. 

टॅग्स :PuneपुणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHealthआरोग्य