शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

भाटघर, नीरा देवघर धरणभागात टॅँकर सुरू करा

By admin | Published: March 28, 2017 2:08 AM

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३२ टक्के, तर नीरा देवघर धरणात

भोर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. भोर तालुक्यातील भाटघर धरणात फक्त ३२ टक्के, तर नीरा देवघर धरणात २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे दोन्ही धरणभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. टॅँकर सुरू करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.बारामती व फलटण तालुक्यातील डाव्या व उजव्या कालव्यांना शेतीसाठी १० मार्चपासून नीरा देवघर धरणातून ७६० क्युसेक्सने व भाटघर धरणातून २००० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडले आहे. भोर तालुक्यात मागील वर्षी भाटघर व नीरादेवघर दोन्ही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र अडीच महिन्यांपासून धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी खाली सोडल्याने भाटघर धरणातील पाणीसाठा ३२ टक्क्यांवर आला आहे. नीरादेवघर धरणातही २८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप अडीच महिने बाकी आहेत. त्यामुळे धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने दोन्ही धरण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. (वार्ताहर)पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरूनीरा देवघर धरण भागातील रिंगरोड धारांबे, पऱ्हर खुर्द, पऱ्हर बुद्रुक, निवंगण, धानवली, शिरवली हि. मा, चौधरीवस्ती, मानटवस्ती व महाड-पंढरपूर रोडवरील शिरगाव, सोमजाईवस्ती, सुईरमाळ, कारुंगण यांसह अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरू झाली आहे. जवळपास कुठेच पाणी उपलब्ध नसल्याने गावापासून ३ किलोमीटरवर असलेल्या धरणातून पाणी आणण्याशिवाय महिलांकडे कोणताच पर्याय नसल्याने पाण्यासाठी दिवसभर पायपीट सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हेच काम महिलांना करावे लागत आहे.भाटघर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने धरणात असणाऱ्या विहिरी कोरड्या पडत असल्याने हर्णस, जोगवडी, आस्कवडी, डेरे, म्हशीवली, कांबरे खुर्द, कुरुंजी यांच्यासह अनेक गावांतील विहिरीतील मोटार बंद पडत आहेत. त्यामुळे अनेक गावांत दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अनेकदा गाळमिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. दोन मोटारमुळे वीज बिल अधिक प्रमाणात येत आहे. नवीन पाईप घेणे त्याला वायर व मजुरी ही कामे दरवर्षी उन्हाळ््यात करावी लागतात. मात्र हे ग्रामपंचायतींना परवडत नाही.- ज्ञानेश्वर नलावडे, उपसरपंच, कुरुंजी