शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

दुष्काळाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

By admin | Published: June 02, 2016 12:34 AM

सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. सत्ताधारी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्ते, पाणी, वीज याबाबत गंभीर स्वरूपाच्या समस्या शेतकऱ्यांना

पाटेठाण : सद्य:स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची दाहकता तीव्र होत आहे. सत्ताधारी सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच रस्ते, पाणी, वीज याबाबत गंभीर स्वरूपाच्या समस्या शेतकऱ्यांना भेडासावत असून, शेतातील उत्पादित होत असलेल्या कुठल्याही शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे परिणामी दुहेरी संकटात सापडलेला शेतकरीवर्ग आज सरकारच्या उदासीन धोरणांमुळे देशोधडीला लागला आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. पाटेठाण येथे नवीन ग्रामसचिवालय व जलशुद्धीकरण केंद्र उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. एक वर्ष सत्तेत आलेल्या या सरकारने नुसतेच जाहिरातबाजी करून मोठ्या प्रमाणात विकासकामे करीत असल्याचा दिखाऊपणा करण्याचा सपाटा लावला आहे; परंतु दुष्काळी परिस्थितीत होरपळणारा, शेतकऱ्यांसाठी कुठल्याही कर्जमाफी, तसेच हिताच्या विधायक योजना राबवल्या जात नसल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्हा मध्यवर्र्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले, की माझ्या आमदारकीच्या कालावधीत विकासकामासांठी कुठल्याही गटातटाच्या राजकारणाचा विचार न करता तसेच भेदभाव न करता निधी दिला; परंतु सध्या काही लोक झालेली सर्वच कामे आम्ही मंजूर केली असल्याची टिमकी वाजवत आहेत. बँकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामे मार्गी लागत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी माजी आमदार अशोक पवार, अप्पासाहेब पवार, वैशाली नागवडे, पांडुरंग राऊत, बाळासाहेब थोरात, रोहिणी पवार, योगीनी दिवेकर, नितीन दोरगे, मानसिंग पाचुंदकर, ज्योती खळदे, विकास लवांडे, पाटील यादव, संदीप हंबीर, मनोज हंबीर, भाऊसाहेब ववले, मनोज ववले, शुभांगी थोरात, दिलीप हंडाळ उपस्थित होते. (वार्ताहर)