शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

व्हीआयपी कोट्याला अजूनही प्रचंड मागणी

By admin | Published: November 15, 2015 1:13 AM

रेल्वेची आॅनलाईन बुकिंग सुरू झाली़ अचानक प्रवास करायचा झाला तर तत्काळ तिकीटे आली़ याशिवाय वैयक्तिक वाहने वाढली़ विमानांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त आणि

पुणे : रेल्वेची आॅनलाईन बुकिंग सुरू झाली़ अचानक प्रवास करायचा झाला तर तत्काळ तिकीटे आली़ याशिवाय वैयक्तिक वाहने वाढली़ विमानांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त आणि सहज उपलब्ध झाला असला तरी रेल्वेच्या व्हीआयपी कोट्याची मागणी अजूनही तशीच असल्याचे या दिवाळीत दिसून आले़ दिवाळीच्या काळातील आरक्षण ४ महिन्यांपूर्वीच फुल्ल झाले. तत्काळमध्येही कमालीची वेटिंग. अशा परिस्थितीत प्रवासात बर्थ मिळविण्यासाठी प्रवाशांची कसरत सुरू आहे. अनेक प्रवाशांनी अखेरचा प्रयत्न म्हणून ‘व्हीआयपी सेटिंग’ करण्यावर भर दिल्यामुळे ‘डीआरएम’ कार्यालयात येणाऱ्या व्हीआयपी कोट्याच्या अर्जात दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आली. एकट्या पुणे -जम्मूतावी झेलम एक्सप्रेसला १२ जागांच्या कोट्यासाठी १०० हून अधिक अर्ज दिवाळीच्या काळात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली़ पुणे विभागातून दररोज साधारण ८०० जागांचा कोटा असतो़ पण सणाच्या काळात त्यात इतकी प्रचंड वाढ होती, की आमचाही नाईलाज होतो़ त्यामुळे एकाला जागा दिली की, दुसरे नाराज होतात, त्यातून अनेक जण मनात राग धरुन बसतात, असे या अधिकाऱ्याने सांगितले़दिवाळीच्या अगोदर आपापल्या गावी जाण्यासाठी सर्वांनाच घाई होती़ अनेक प्रवासी तत्काळच्या रांगेत उभे होते. तत्काळमध्येही वेटिंगचे तिकीट हाती पडल्यामुळे अनेक प्रवाशांची निराशा झाली. पुण्याहून दिवसाकाठी १४० हून अधिक रेल्वेगाड्या धावतात. पुणे, कोल्हापूर, मिरज येथून सुटणाऱ्या गाड्यांमधील व्हीआयपी कोट्यातून जागा मिळण्यासाठी अनेक प्रवाशांनी राजकीय नेत्यांच्या लेटरपॅडवर अर्ज करणे सुरू केले होते़ दिल्ली व उत्तरेकडे जाणाऱ्या प्रत्येक रेल्वेगाडयांमागे साधारणत: १५० ते १७५ अर्ज व्हीआयपी कोट्यासाठी येतात.मात्र, त्या गाड्यांमध्ये केवळ १० ते १२ आसने उपलब्ध असतात. इतर भागांकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी ७० ते ८० अर्ज असतात. त्यामुळे व्हीआयपी कोट्यातून नेमके कुणाला रिझर्व्हेशन द्यायचे, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांची पंचाईत झाली आहे. अनेक प्रवाशांनी व्हीआयपी कोट्यातून अर्ज करूनही पुरेसा कोटा नसल्यामुळे त्यांना बर्थ मिळाला नाही. तर काही प्रवाशांना बर्थ मिळाल्यामुळे त्यांचा प्रवासही सुखाचा झाला. अजून दोन दिवस व्हीआयपी कोट्यासाठी अशाच मोठ्या प्रमाणात अर्ज येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.