शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लहान मुलाचं पोट सुटलंय का?... सावधान; हा असू शकतो हाय ब्लड प्रेशरचा 'अलार्म'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 16:44 IST

भारतात दर पाचव्या प्रौढ व्यक्तीमध्ये आणि दर दहाव्या मुलांमध्ये निदान

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : भारतात दर पाचव्या प्रौढ व्यक्तीमध्ये आणि दर दहाव्या मुलामध्ये उच्च रक्तदाबाचे निदान होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीचे वजन १ किलोने वाढले की वरचा रक्तदाब वाढतो. मुलांमधील सुटलेले पोट हा उच्च रक्तदाबाचा ‘अलार्म’ आहे. प्रगत देशांमध्ये वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दर वाढदिवसाला मुलांचा रक्तदाब मोजला जातो. वयाच्या तिसऱ्या वर्षी पोटाचा घेर ५० सेंटीमीटर असेल आणि १३ व्या वर्षी पोटाचा घेर ८० सेंटीमीटर असेल तर स्थूलता आहे, असे समजावे आणि पालकांनी दर सहा महिन्यांनी मुलांची उंची, वजन आणि रक्तदाब तपासावा, असे डॉक्टरांनी सुचवले आहे.

भारतात सर्वाधिक मृत्यूचे कारण रक्तदाब हेच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दररोज ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ले पाहिजे. मात्र, भारतीय लोक दररोज १०-२० ग्रॅम मीठ खातात. बेकरीच्या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. चहा, कॉफीच्या सेवनामधूनही शरीरात मोठ्या प्रमाणात साखर जाते.  

डॉ. राहुल जोशी म्हणाले, ‘तरूणांमध्ये वाढता लठ्ठपणा ही चिंतेची बाब असून यामुळे उच्च रक्तदाबाची जोखीम वाढत आहे. तंबाखू सेवन, धुम्रपान आणि चुकीची जीवनशैली देखील मुख्य जोखमीचे घटक ठरू शकतात. ज्यांच्या कुटुंबात उच्च रक्तदाबाचा वैद्यकीय इतिहास आहे,त्यांच्या मते इतरांपेक्षा जास्त जोखीम असू शकते. ज्यांना सध्या उच्च रक्तादाबाचा त्रास नाही, त्यांच्यासाठी चांगली जीवनशैली ही गुरूकिल्ली ठरू शकते.’

रक्तदाब वाढण्याची कारणे 

- अनुवंशिकता हे उच्च रक्तदाबामागील मुख्य कारण आहे.- टीव्हीसमोर बसून राहणे, मोबाईल गरजेपेक्षा जास्त वेळ खेळताना मुलांच्या हालचाली कमी होतात आणि परिणामी वजन वाढते.- आहाराच मिठाचा अतिवापर, जंक फूडचे सेवन- ताणतणाव, बैैठी जीवनशैैली, व्यायमाचा अभाव- लठ्ठपणा

काय काळजी घ्यावी?

- जेवणात मिठाचा अतिरेक टाळावा.- दिवसातून चारवेळा पोटभर खाणे बंद करावे.- वजन संतुलित राखण्यावर भर असावा.- आहारात पालेभाज्या, कच्च्या भाज्या, कडधान्ये यांचे प्रमाण वाढवावे- व्यायाम आणि योगासनांवर भर द्यावा

चहापानाऐवजी पाणी, सॅलड, फळे यावर भर द्यावा

‘बैठे काम वाढले की साखरेचे कण एकत्र जोडून चरबी तयार होते. मुलांचा टीव्हीसमोरचा वेळ वाढला की पोटही वाढते. इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, रक्तदाब ५ अंकांनी वाढल्यास जीवनशैलीत बदल केला पाहिजे आणि १० अंकांनी वाढल्यास औषधोपचार सुरू केले पाहिजेत. नेहमीपेक्षा १ कप चहा जास्त प्यायल्यास शरीरात ५४ कॅलरी जास्त जातात. याप्रमाणे, वर्षाला ३ किलो वजन वाढते आणि पर्यायाने उच्च रक्तदाब वाढतो. त्यामुळे चहापानाऐवजी पाणी, सॅलड, फळे यावर भर द्यावा. सध्या चहा ४०० रुपये किलो आहे. त्यापेक्षा जेवण स्वस्त आहे असे डॉ. हेमंत जोशी यांनी सांगितले.'

टॅग्स :docterडॉक्टरhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यSocialसामाजिक