शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

बैलगाडामालकांचा रास्ता रोको

By admin | Published: June 05, 2016 3:38 AM

‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने नारायणगाव येथे आज (दि.४) पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको

नारायणगाव : ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने नारायणगाव येथे आज (दि.४) पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बैलगाडामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ या मागणीसाठी शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला़ दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर, मंडलाधिकारी योगेश पाडळे व तलाठी नितीन चौरे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे या वेळी सांगितले. या अंदोलनाला पुणे, नगर, कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडा मालक-चालक, शिवनेरी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या कार्यक्रमाचे नियोजन शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, बैलगाडा मालक राहुल बनकर, प्रकाश कबाडी, राकेश खैरे, डॉ़ संतोष वायाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राजेंद्र मेहेर, समीर वाजगे, हेमंत कोल्हे, नीता लांडे, योगेश तोडकर आदींनी केले़ या वेळी परमेश्वर चौधरी म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती बंद केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. जनावरे पाळण्यासाठी किती कसरत करावी लागते, हे ‘पेटा’वाल्यांना ज्ञात नाही़ पुणे जिल्ह्यातील खासदार बैलगाडा बंदीविषयी आवाज न उठवता गप्प आहेत़ मात्र बैलगाडा मालकांच्या जीवावरच हे राजकीय नेते मोठे झाले आहेत़ आता मात्र त्यांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे़ प्राणी संघटनेचे सदस्य असलेले अनिल कटारीया म्हणाले, की ज्यांनी कधी शेती केली नाही, जनावरे पाळली नाहीत अशा व्यक्तींना शेतकरी व बैल यांच्यातील असलेला जिव्हाळा, शेतकरी बैलाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात़ याची जाणीव प्राणीमित्र सदस्यांना नसल्याने फक्त आपल्या स्वार्थासाठी व पेटा संघटनेच्या फायद्यासाठी ही बंदी आणली आहे़ मात्र या प्राणीमित्र सदस्यांनी ग्रामीण भागात येवून प्रत्यक्षात शेतकरी अथवा बैलगाडा मालक बैलाचा कशा प्रकारे सांभाळ करतात. त्यांना राहण्यासाठी कशा सुखसुविधा उपलब्ध केल्या आहेत हे पाहावे़ शर्यती सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे या वेळी त्यांनी सांगितले. पेटाने स्वत:च्या फायद्यासाठी ही बंदीचा घाट घातला आहे, असा आरोप रामकृष्ण टाकळकर यांनी केला आहे़ (वार्ताहर)...तर बेमुदत आंदोलन!मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविली होती़ त्या वेळी केंद्रीय परिवहनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन बैलगाडा सुरू होण्यासाठी केंद्राच्या मार्फत राजपत्र जारी केले होते़ परंतु, पेटा संस्थेने पुन्हा केंद्राच्या राजपत्राच्या निर्णयाविरोधात अपील करून स्थगिती मिळविली़ यावर (दि़ २८) जुलै रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. निर्णय विरोधात गेल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर या निर्णयाविरोधात अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक संघटना व शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असे या वेळी सांगितले.