शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; ५ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, आंबेगावातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 13:10 IST

प्रशासनाने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने आणि गांभीर्याने या समस्येकडे पाहणे आवश्यक

धनकवडी : आंबेगाव पठार परिसरातील चंद्रांगण फेज ५ मधील सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असून, ताे गंभीर जखमी झाला आहे. समर्थ सचिन सूर्यवंशी असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

समर्थवर पाच-सहा श्वानांनी हल्ला केला असून, त्याच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर खाेल जखमा झाल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावर एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता कक्षामध्ये उपचार सुरू आहेत. मागच्याच आठवड्यात आंबेगाव बुद्रुकमधील दळवीनगर परिसरातील आराध्या अभय चव्हाण या चिमुकलीवर भटक्या श्वानाने हल्ला चढवला हाेता. त्यात ती जखमी झाली हाेती. याच घटनेच्या दुसऱ्या दिवशी आणखी एका मुलाला चावा घेतला. त्यामुळे धनकवडीसह आंबेगाव बु. परिसरात माेठ्या प्रमाणात वाढलेल्या भटक्या श्वानांच्या संख्येकडे प्रशासनाच्या हाेत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळत आहे.

श्वानांचा बंदोबस्त करण्याकडे संबंधित विभागाकडून होणारा कानाडोळा पुणेकरांच्या जिवावर उठल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने भटक्या श्वानांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केवळ बघ्याची भूमिका न घेता तातडीने आणि गांभीर्याने या समस्येकडे पाहणे आवश्यक आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरण व नियंत्रण पथकांमार्फत होणारी कारवाई परिणामकारक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

श्वानांची दहशत दिवसेंदिवस जीवघेणी ठरत असताना प्रशासन मूग गिळून गप्प का? भटक्या श्वानांचा बंदोबस्त कधी करणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला असून, श्वानांची झुंड दिसली तरी मनात धडकी भरते. - अनिल कोंढरे, उपसरपंच, आंबेगाव बु.

 

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राHealthआरोग्यambegaonआंबेगावdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलenvironmentपर्यावरण