शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

विद्युत खांबांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : दीपक म्हैसेकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 20:33 IST

काही दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांच्या (प्रखर विद्युत झोत असलेले दिवे) खांबाचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकामातील कुचराईमुळे दुर्घटना घडल्यास गुन्हा दाखल करणार 

पुणे : काही दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांच्या (प्रखर विद्युत झोत असलेले दिवे) खांबाचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. या खाबांच्या मजबुतीची चाचणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करावी आणि कमकुवत खांबांची तातडीनी दुरुस्ती करावी असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. तसेच, या कामात कुचराईमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामांची आणि मुक्कामांच्या ठिकाणांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली. अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील दौंड तालुक्यातील वरवंड पालखी तळाला म्हैसेकर यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पालखी तळावर उभारण्यात आलेले हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात कोसळल्याचे सांगितले. त्याची दखल घेत, म्हैसेकर यांनी हायमास्ट दिव्यांच्या पायाची पाहणी केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील तळावर उभारण्यात आलेल्या सर्वच दिव्यांच्या खांबाची मजबुती तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. हायमास्ट दिवे योग्यरित्या उभारणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची दिव्यांची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. तीर्थ क्षेत्र व विकास निधीतून नीरा नरसिंहपूर येथील देवस्थानाच्या विकासकामांनाही म्हैसेकर यांनी भेट दिली. कामाचा दर्जा राखत, जलदगतीने काम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊस