शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

Success Story: विशीत संसार तुटला, आयुष्यात हार न मानता दिल्ली गाठली अन् मंजरी IPS झाल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 15:18 IST

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे....

IPS Manjari Jaruhar Success Story: कमी वयात झालेले लग्न अन् काही दिवसांत नात्यात जर दुरावा आला तर कुठलाही माणूस खचतो. त्याला त्याच्या आयुष्यातील रस निघून गेल्याची जाणीव होते. खूपच कमी लोक लहान वयातील संकटावर मात करत आयुष्यात यशस्वी होतात. त्यामध्येच मंजरी जरुहर यांचे नाव घेतले जाते. ज्यांनी अनेक अडचणींचा सामना करूनही इतिहास रचला. मंजरी यांचे जीवन मोठ्या चढ-उतारांनी भरलेले आहे. त्यांची ही कहाणी देशातील प्रत्येक मुलीसाठी प्रेरणादायी ठरली. अनेक संकटांवर मात करत मंजरी जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी झाल्या.

मंजरी जरुहर यांच्या आयुष्यावर एक चित्रपटही निघाला आहे. त्यांच्या यशोगाथेवर 'जय गंगाजल' नावाचा बॉलीवूड चित्रपट आहे. जरुहर या बिहारच्या पहिल्या महिला IPS आहेत. तसेच देशातील पहिल्या पाच महिला IPS अधिकाऱ्यांच्या यादीत देखील समाविष्ट आहेत. पण, त्यांना इथपर्यंत पोहोचणं तितकं सोपं नव्हतं. सुशिक्षित कुटुंबातील असूनही वयाच्या १९ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. मात्र, काही दिवसांतच हे नातेही तुटले. तरीही त्यांनी हार न मानता दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससीची परीक्षा पास केली आणि त्यांनी आयपीएसची पोस्ट मिळवली.

'ठरवून यश मिळवलं'-

वैवाहिक जीवनातील अपयशानंतर मंजरी खचल्या. पण त्यावर त्यांनी मात करत स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी स्वतःला प्रेरित करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांचे आयएएस अधिकारी IAS) होण्याचे स्वप्न होते. नागरी सेवा परीक्षेची तयारी करण्यासाठी यासाठी मंजरी जरुहर दिल्लीला गेल्या. त्यानंतर, तेथील कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला आणि युपीएससीची (UPSC) तयारी सुरू केली. रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर मंजरी यांना मेहनतीचे फळ मिळाले. त्या १९७६ मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आणि बिहारच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या.

दुसऱ्या प्रयत्नात यश प्राप्त-

मंजरी जरुहर यांनी १९७४ मध्ये पहिल्यांदा नागरी सेवा परीक्षा दिली, ज्यामध्ये त्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या होत्या. पण त्यावेळी त्यांना परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यावर अपयश आले. यानंतर हार न मानता पुन्हा त्यांनी पहिल्यापासून तयारी सुरू केली. युपीएससीची पूर्व आणि मुख्य परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. यंदा मात्र त्यांनी मुलाखतीची चांगली तयारी केल होती. त्यामुळे परीक्षेच्या या अखेरच्या टप्प्यात यश प्राप्त केले आणि १९७५ मध्ये दुसऱ्या प्रयत्नात UPSC ची परीक्षेत यश मिळवले. जहरूर यांना लहानपणापासूनच घरच्या कामात लक्ष देण्यास सांगितले जात होते. तसेच कुशल गृहिणी बनण्याचा सल्लाही वारंवर देण्यात येत होता. पण कमी वयात आलेल्या संकटांवर मात करत त्या युपीएससीची परीक्षा पास झाल्या आणि देशभरातील मुलींसाठी प्रेरणास्थान झाल्या.

दिल्ली विद्यापीठातून घेतले पदव्युत्तर शिक्षण-

IPS मंजरी जारुहर यांनी पाटणा महिला महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली होती. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्याच्या उद्देशाने दिल्लीत आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अभ्यास करत दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच, नागरी सेवांच्या तयारीसाठी त्यांनी कोचिंगमध्ये प्रवेश घेतला आणि अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

टॅग्स :Puneपुणेupscकेंद्रीय लोकसेवा आयोगBiharबिहारdelhiदिल्लीbollywoodबॉलिवूड