शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
3
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
4
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
5
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
6
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
7
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
8
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
9
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
10
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
11
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
12
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
13
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
14
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
15
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
16
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
17
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
18
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
19
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
20
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज

धाड टाकलेल्या कारखान्यातून नगरसेवकांना तूरडाळीचा पुरवठा

By admin | Published: November 17, 2015 3:20 AM

पालकमंत्री गिरीश बापट यांनी खालापूर येथील ईटीसी अ‍ॅग्रो कंपनीवर धाड टाकून

पुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी खालापूर येथील ईटीसी अ‍ॅग्रो कंपनीवर धाड टाकून तूरडाळीचा साठा जप्त केला होता. त्याच कंपनीतून भाजपच्या नगरसेवकांना थेट दहा हजार किलो डाळ ९७ रुपये किलोने देण्यात आल्याचे बिलच महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी उघडकीस आणले आहे. पालकमंत्र्यांनी धाड टाकायची अन् नगरसेवकांनी ती कमी किमतीमध्ये विकायची, असा अत्यंत चुकीचा प्रकार सुरू असल्याची टीका शिंदे यांनी केली.तूरडाळीच्या किमतीने दोनशे रुपयांचा आकडा ओलांडल्याने सर्वसामान्य जनता महागाईने होरपळून निघाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने डाळीवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांवर धाडी टाकून डाळीचे साठे जप्त केले. त्यामुळे डाळीचा आणखीच तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी १०० रुपयांनी तूरडाळ विक्री करणारे स्टॉल लावले. मात्र, या स्टॉलमधून नागरिकांना नेमकी किती डाळ वितरीत करण्यात आली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर धाड टाकलेल्या कंपनीतून भाजपच्या नगरसेवकांना थेट डाळीचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने केला आहे.अरविंद शिंदे यांनी सांगितले, की पालकमंत्री गिरीश बापट यांनी जप्त केलेली डाळ त्यांच्या मतदारसंघामध्ये स्टॉल लावून १०० रुपये किलोने विकली आहे. भाजपचे नगरसेवक अशोक येनपुरे यांच्या नावे ८ नोव्हेंबर रोजी दहा हजार किलो डाळ पाठविण्यात आली. सध्या ग्राहक पेठेला स्वस्त दराने डाळ उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिक ग्राहक पेठेतून डाळीची खरेदी करत नाही, त्यामुळे ती त्यांच्यापर्यंत पोहचण्यात अडचणी येत आहेत.’ईटीसी कंपनीकडून आलेल्या दहा हजार किलो तूरडाळीचे वाटप कार्यकर्त्यांमध्ये करण्यात आले. त्यांनी स्टॉल लावून स्वस्त दराने त्याची विक्री केली आहे. शहरामध्ये आतापर्यंत सव्वा लाख किलो तूरडाळ स्वस्त दरामध्ये विकण्यात आली आहे. -अशोक येनपुरे, नगरसेवक