शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
4
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
5
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
6
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
7
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
8
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
9
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
10
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
11
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
12
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
13
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
14
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
15
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
16
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
17
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
18
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
19
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
20
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?

सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्याने बारामतीत पाठिंबा ; प्रकाश आंबेडकरांचे स्पष्टीकरण

By अजित घस्ते | Updated: April 29, 2024 16:29 IST

वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू

पुणे: ‘‘सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी भेटून विनंती केल्यामुळे आम्ही बारामतीमध्ये उमेदवार दिलेला नाही. शरद पवार हे सध्या बारामतीतच अडकून पडले आहेत. वंचितसाठी यंदा सकारात्मक वातावरण असून यावेळी आम्ही आमचे लोकसभेचे खाते नक्की उघडू,’’ असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराची सुरुवात सोमवारी ॲड. आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानिमित्ताने सोमवारी पानमळा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर बोलत होते. वंचितचे उमेदवार वसंत मोरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ पानमळातून करण्यात आला. 

यापुढे आंबेडकर म्हणाले, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशावरील कर्ज वाढले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांचे पती प्रभाकरण १० दिवसांपुर्वी म्हणाले की, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपेल. निवडणुका होणार नाहीत. संविधान संपेल. गल्लोगल्ली मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल. त्याबरोबर सध्या लोकसभा निवडणूकीत १२ मतदार संघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात थेट लढत असल्याचे चित्र आहे. त्या मतदार संघात मात्र वंचित फायदा होणार आहे. सेक्युलर मतदार सध्या वंचितकडे ओळणार असल्याचे दिसते. महाराष्ट्रात सर्वच मतदार संघात मोठी अटितटीची लढाई आहे. मोदी शासनाने कबूल केले आहे की, १७ लाख कुटुंबानी भारत सोडला आहे. अनेकांनावर दबाव टाकण्यात आला होता. त्यामुळे ते परदेशात जावून बसले आहेत. अझानच्या भूमिकेमुळे मुस्लिम मतदार एकतर्फी वसंत मोरे यांना मतदान करतील. मोरे यांनी मुस्लिमांची बाजू घेतली म्हणून त्यांना डावलले जात होते. पुण्यातील उमेदवार मोठ्या फरकाने निवडणून येणार नाही.

यंदा मोदींना ३०० पेक्षा कमी जागा मिळतील 

देशात सध्या संविधान बदलणार असल्याचे भाजपाच्या नेतेकडून बोलले जात आहे. तशी परस्थिती निर्माण केली जात आहे. मात्र मोदी हे बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकत नाही, असा खोटा दावा करत आहेत. मात्र ते पंतप्रधान आहेत. त्यामुळे त्यांना कायद्यात बदल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते बोलत आहे. सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे. तो राग मतदानातून दिसेल. त्यामुळे सध्या विविध सर्व्हे भाजपला ३०० पेक्षा कमी मिळतील असे चित्र दिसत आहे.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरJayant Patilजयंत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४