शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
2
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
3
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
4
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
5
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
6
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
7
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
8
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
9
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
10
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
11
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
12
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
13
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
14
मुंबईला 'अजिंक्य' ठेवण्यासाठी पुन्हा रहाणे; चॅम्पियन संघाचा कर्णधार, अय्यर-ठाकूरही मैदानात
15
अधिक व्याज देईल 'ही' स्कीम,  ₹१०,००,००० च्या गुंतवणूकीवर मिळतील ₹३०,००,०००; फक्त एक ट्रिक वापरा
16
अरबाजने सांगितलं छत्रपतींचा जयजयकार न करण्याचं कारण, म्हणाला "मी संभाजीनगरचा आणि..."
17
तुमच्या देवघरात ‘या’ देवता आहेत? ‘ही’ मूर्ती कधीही ठेवू नये! पण का? शास्त्र सांगते...
18
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
19
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
20
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न

मानवतावादी हितासाठी स्वराज्याची निर्मिती

By admin | Published: February 21, 2017 2:04 AM

छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची निर्मिती ही मानवतावादी हितासाठी केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन

सासवड : छत्रपती शिवाजीमहाराज यांनी स्वराज्याची निर्मिती ही मानवतावादी हितासाठी केली. समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन, ज्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या व्यक्तीला मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे दिली. आग्रा येथून केलेली सुटका, अफझलखानाचा वध, बाजीप्रभू देशपांडे, मदारी मेहतर अशा अनेक सरदारांनी व मावळ्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठीआपले प्राण अर्पण केले. छत्रपती शिवाजीमहाराजांनी खऱ्या अर्थाने सोशल इंजिनियरिंग केले, असे मत शंकरराव भेलके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नारायण टाक यांनी व्यक्त केले.छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त वाघिरे महाविद्यालय सासवड येथे ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तानाजी साळवे होते. कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम, डॉ. किरण रणदिवे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. डी. एस. कदम यांनी केले. टाक यांचे छत्रपती श्री शिवाजीमहाराज आणि त्यांचे सोशल इंजिनियरिंग या विषयावर व्याख्यान झाले. छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचे आर्थिक विचार, स्त्रियांविषयी असणारी भूमिका, पर्यावरण, बौद्धिक चातुर्य, व्यवस्थापन, पुरंदरचा इतिहास, स्वराज्य निर्मितीमागील भूमिका, स्वराज्यनिर्मिती ही अन्यायाविरुद्ध असणारा लढा होता इत्यादीविषयी सविस्तर विवेचन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. साळवे यांनी, आजच्या सामाजिक वातावरणात छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी केलेले कार्य, त्यांचे शेती, व्यापार, लष्कर, आरमार संघटन इत्यादींविषयीचे विचार व कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या जीवनकार्याचे वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. किरण रणदिवे यांनी आभार मानले.