शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

पाणीबचतीसाठी तळेगावात प्रयत्न

By admin | Published: April 26, 2016 2:19 AM

दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

तळेगाव स्टेशन : दुष्काळी परिस्थिती आणि धरणातील कमी पाणीसाठ्याचा विचार करता आगामी दोन महिने शहरास पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी नगरपालिकेने जलबचत अभियानाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी जलबचत अभियानास नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाणीपुरवठा समितीचे सभापती व उपनगराध्यक्ष गणेश खांडगे यांनी केले आहे.याबाबत खांडगे म्हणाले, ‘‘पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नगर परिषदेत सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी आणि अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. त्यात घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात गाव भागातील सार्वजनिक नळकोंडाळी, गृहसंकुलातील पाण्याच्या टाक्या आणि गळतीच्या ठिकाणांवर पाणी वाया जाणार नाही, अशा उपाययोजनांचे काम सुरू केले आहे. रविवारपर्यंत ११२ नळांना तोट्या बसविण्यात आल्या. त्याची नोंद केली आहे. पाणी विभागाचे कर्मचारी आणि सुमारे १५० जलदूतांच्या साहाय्याने त्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. जर पुन्हा तोट्या काढल्या गेल्या, तर संबंधितांचे नळजोड तोडून दंडात्मक कारवाई केली जाईल. गावभागातील मोहिमेनंतर स्टेशन भागातही मोहीम येत्या आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांच्या सहकार्याने पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत सुरू ठेवता येईल. (वार्ताहर)