शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

टाटा पुण्याचा पाणी प्रश्न सोडवणार; स्वत:च्या ८० टक्के जमिनीवर 'पाणी' सोडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:45 PM

यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले...

पुणे : शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता टाटा कंपनीच्या मुळशी धरणातून पाच टीएमसी पाणी घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत. यासंदर्भात आता टाटा कंपनीनेही सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धरणाची उंची वाढवून निर्माण होणाऱ्या अतिरिक्त पाण्यातून ही गरज पूर्ण करता येणे शक्य असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच टाटा कंपनी व राज्य सरकारला सादर करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मुळशी धरण टप्पा एक व दोनमधील पिण्याच्या पाण्यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेतली. यावेळी टाटा कंपनी, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.

मुळशी धरणाच्या टप्पा एकमध्ये धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यास टाटा कंपनीने तत्त्वतः होकार दर्शवला आहे. याबाबतचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून टाटा कंपनीला सादर करण्यात येणार आहे. धरणाची उंची वाढवल्यानंतर निर्माण होणाऱ्या पाण्याच्या फुगवट्यामुळे काही जमीन पाण्याखाली जाणार आहे. यातील ८० टक्के जमीन ही टाटा कंपनीच्या मालकीची असून, उर्वरित २० टक्के जमीन शेतकऱ्यांची आहे. ही जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकार मदत करेल, असे आश्वासन पवार यांनी टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या निर्णयामुळे धरणाची क्षमता वाढल्यानंतर निर्माण होणारे अतिरिक्त पाणी पुणे शहराला मिळण्याची शक्यता वाढली आहे.

धरणाशेजारील ५० गावांनाही पाणी :

मुळशी धरणाच्या दुसऱ्या टप्प्यात धरणाशेजारील ५० गावांच्या पिण्याच्या पाण्यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. याबाबत पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. कंपनीच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्यामुळे कंपनीने या ५० गावांना पाणी देण्याचे मान्य केले आहे.

टॅग्स :DamधरणPuneपुणेTataटाटा