शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

करदात्यांची कक्षा रुंदावली - चंद्रशेखर चितळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 4:52 AM

यंदाच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तूट दाखविण्यात आली आहे. राज्यावर तब्बल ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून, त्यापोटीच्या व्याजावर अधिक खर्च होतो. त्यामुळे तूट कमी करण्यासाठी सवलतींना कात्री लावल्याचे दिसून येते. मात्र, वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) ५ लाख ३२ हजार नवे करदाते जोडल्या गेल्याने करदात्यांची कक्षा...

पुणे - यंदाच्या अर्थसंकल्पात १५ हजार कोटींची तूट दाखविण्यात आली आहे. राज्यावर तब्बल ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज असून, त्यापोटीच्या व्याजावर अधिक खर्च होतो. त्यामुळे तूट कमी करण्यासाठी सवलतींना कात्री लावल्याचे दिसून येते. मात्र, वस्तू आणि सेवा करामध्ये (जीएसटी) ५ लाख ३२ हजार नवे करदाते जोडल्या गेल्याने करदात्यांची कक्षा चांगली रुंदावली असल्याने महसूलवाढीत त्याचा सकारात्मक बदल घडू शकेल, अशी प्रतिक्रिया मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे (एमसीसीआयए) कोशाध्यक्ष चंद्रशेखर चितळे यांनी दिली.राज्याच्या अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण एमसीसीआयएच्या टिळक रस्त्यावरील सभागृहात झाले. त्यानंतर चितळे यांनी अर्थसंकल्पावर भाष्य केले. संगणकतज्ज्ञ दीपक शिकारपूर या वेळी उपस्थित होते. जीएसटीतील बदलाचे अधिकार केवळ जीएसटी कौन्सिलकडे आहेत; त्यामुळे त्याबाबतचा कोणताही प्रस्ताव अर्थसंकल्पात नव्हता. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून जीएसटी लागू झाला. त्यानंतर ५ लाख ३२ हजार नवे करदाते या प्रणालीशी जोडले गेले. राज्यातील जीएसटी करदात्यांची संख्या १३ लाख ६२ हजार इतकी झाली आहे. त्यापोटी फेब्रुवारीअखेरीस ४५ हजार ८८६ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. थेट करदात्यांच्या संख्येत वाढ होणे, हे महसूलवाढीसाठी चांगले निदर्शक आहे. प्राप्तिकर विभागाचेदेखील या करदात्यांवर लक्ष असेल. त्यामुळे भविष्यात प्राप्तिकर दात्यांच्या संख्येतही वाढ होईल, असे चितळे म्हणाले.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागाला झुकते माप देण्यात आले आहे. सरकार ई-गव्हर्नन्सला चालना देत आहे. त्यात स्टार्टअप उद्योगांना सामावून घेतल्यास त्याचा नव उद्योजकांना फायदा होईल, असे शिकारपूर म्हणाले.शेती आणि पूरक गोष्टींवर भरराज्यावर ४ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्याच्या व्याजापोटी मोठी रक्कम सरकारला मोजावी लागते. याशिवाय, व्यवस्थापनाचा खर्चदेखील मोठा आहे. तसेच, सातव्या वेतन आयोगामुळे राज्याच्या तिजोरीवर अधिकच भार पडेल. परिणामी, सुमारे ३ लाख १ हजार कोटींच्या अर्थसंकल्पात १५ हजार ३७५ कोटी रुपयांची तूट सरकारला दाखवावी लागली. स्पर्धा परीक्षेतील सहभाग वाढविण्यासाठी आणि कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी उचललेली पावले स्वगतार्ह आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती आणि पूरक गोष्टींवर अधिक भर दिला असल्याचे चितळे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८