शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
3
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
4
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
5
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
6
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
7
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
8
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

‘ती’च्या गणपतीला समाजाने नाकारलेले ‘ते’

By admin | Published: September 26, 2015 2:43 AM

‘त्यांचे’ अस्तित्वच नाकारलेले... तिरस्कार भरल्या नजरांचा सामना रोजचाच.. सहानुभूतीच्या शद्बांचा दुष्काळ सोसत जगणारे ‘ते’. ‘ती’च्या अंगणात आले.

पुणे : ‘त्यांचे’ अस्तित्वच नाकारलेले... तिरस्कार भरल्या नजरांचा सामना रोजचाच.. सहानुभूतीच्या शद्बांचा दुष्काळ सोसत जगणारे ‘ते’. ‘ती’च्या अंगणात आले. ‘ती’ च्या हक्काच्या प्रांगणात विराजमान झालेल्या गणरायाची आरती त्यांच्या हस्ते झाली. त्यांच्या दृष्टीने हा इतिहास होता. आपल्यालाही सन्मान आहे, ही जाणीव जागा करणारा अनुभव होता. पुरोगामित्वाच्या भूमिकेला बळ देण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘ती’चा गणपती या उपक्रमाला आणखी एक पाऊल पुढे नेले. ‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘ती’ च्या गणपतीची आरती तृतीयपंथीय असलेल्या चार जणींच्या हस्ते सन्मानाने बोलावून करण्यात आली. विविध क्षेत्रातील मान्यवर महिलांसोबत त्यांनीही गणरायाच्या आरतीचे ताट हातामध्ये धरले होते. समाज रचनेच्या बेगडी परंपरांना छेद देत, त्यांना मिळालेला सन्मान त्यांच्या डोळ्यांमध्ये दाटला होता आनंदाश्रुंच्या रूपाने. आजवर केवळ नाकारण्यात आलेल्यांना काहीतरी ‘साकारण्यासाठी’ सन्मानाची वागणूक मिळत होती. त्यांच्या अस्तित्वाचा पुरावाच देत होती. मराठी, हिंदी आणि भाषांसोबतच इंग्रजीवरचे त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे होते. गणरायाच्या आरतीला आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांनाही त्यांच्या इंग्रजीने भुरळ पाडली. या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. हा अनुभवही त्यांच्यासाठी आशेचा किरण होता. समाजाला त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडणारी एक क्रांतिकारी घटना होती. लिंगभेदाच्या तकलादू चौकटी उखडून टाकण्याची ही सुरुवात ‘ती’च्या गणपतीच्या निमित्ताने झाली. त्यांनाही जगण्याचा आणि समाजामध्ये वावरण्याचा हक्क आहे. त्यांच्या हक्काच्या लढाईमध्ये आम्हीही सोबत आहोत, असा विश्वास त्यांना ‘लोकमत’ने दिला. ‘आम्हाला कष्ट करून जगण्याची इच्छा आहे. भीक नको संधी हवी, परिवर्तनाची ही नांदी नवी,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. लोकमतचा ‘ती’चा गणपती ही संकल्पना आम्हाला खूप आवडली आणि या आरतीत आम्हाला मान मिळाला. कारण, समाजामध्ये आम्हाला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, ती ‘लोकमत’ने आम्हाला मिळवून दिली. त्यामुळे त्यांचे आम्ही आभार मानतो. असेच विविध उपक्रम ‘लोकमत’ने यापुढे राबविले पाहिजे आणि आम्हाला सहभागी करून घेतले पाहिजे. - अप्पा पुजारी‘ती’चा गणपती ही खूप आगळी वेगळी संकल्पना आहे, अशीच संकल्पना प्रत्येकाने राबवायला पाहिजे. आम्हाला समाज स्वीकारत नाही, आमचा त्रागा करतो. पण ‘लोकमत’ने आम्हाला आमची वेगळी ओळख निर्माण करून दिली.- मोनिका दोडके‘ती’चा गणपती महिलांचा असल्यामुळे महिलांना समाजामध्ये एक प्रकारे आदराची वागणूक दिली जाईल. त्यामुळे प्रत्येक मंडळाने अशी संकल्पना राबवायला हवी. ‘लोकमत’चा खूप चांगला उपक्रम आहे आणि आम्हाला इथे बोलावून, समाजामधील लोकांना एक आदर्श घालून दिला आहे.- कशिश भालके ‘ती’चा गणपती हा उपक्रम प्रेरणादायी आहे, प्रत्येक ठिकाणी पुरुषांना गणपतीच्या आरतीत मान असतो, हेच आम्ही सगळीकडे पाहतो; पण ‘लोकमत’ने आदर्श निर्माण केलेला आहे. आम्हाला या संकल्पनेत सहभागी करून घेतल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे.- रिया शेख