शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुण्यात पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

By विवेक भुसे | Updated: July 19, 2023 15:54 IST

राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत

पुणे : राजस्थानमध्ये बॉम्ब बनविण्याचे साहित्य जमा करुन बॉम्बस्फोटाची साखळी तयार करण्याच्या प्रयत्नात असलेले आणि गेल्या दीड वर्षांपासून फरार असलेल्या दोघा दहशतवाद्यांना पुणेपोलिसांनी आज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार न्यायालयात हजर केले. या संवेदनशील प्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने त्यांना २५ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले राजस्थानमधील दोन अतिरेकी गेल्या दीड वर्षांपासून पुण्यात लपवून बसले असल्याचे उघडकीस आले आहे. एका वाहन चोरीच्या प्रकरणात नाकाबंदीच्या दरम्यान दोघांना ताब्यात घेतले असताना ते फरार अतिरेकी असल्याचे निष्पन्न झाले आहे.इम्रान खान आणि मो़ युनूस साकी (रा. रतलाम, मध्यप्रदेश)अशी या दोन संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी माहिती दिली. कोथरुड पोलीस ठाण्याचे बीट मार्शल प्रदीप चव्हाण आणि अमोल नझन हे १८ जुलै रोजी गस्त घालत होते. त्यावेळी पहाटे पावणे तीन वाजता त्यांनी ३ संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यानंतर त्यांना घरझडतीसाठी नेण्यात आले. त्यावेळी त्यांच्यातील एक जण पळून गेला. पोलिस पथकाने त्यांच्यापैकी दोघांना पकडले. कोंढव्यातील त्यांच्या घरझडतीत पोलिसांनी एक जिवंत काडतुस, ४ मोबाईल आणि लॅपटॉप सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. सुरुवातीला ते वाहन चोर असल्याचा संशय होता.

त्यांच्याकडे सायंकाळी चौकशी केली जात असताना ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यांच्याकडील लॅपटॉपची तपासणी केल्यावर ते देत असलेली माहिती आणि त्यातील कागदपत्रे यात विसंगती आढळून आली. त्यामुळे हे दोघेही देशविघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशय आल्याने शहर पोलिसांनी ही बाब दहशतवाद विरोधी पथकाला कळविली. एटीएसचे पथकही कोथरुड पोलिस ठाण्यात आले. त्यानंतर या दोघांना शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आणण्यात आले. स्वत: पोलिस आयुक्त रितेशकुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांची सखोल चौकशी केली. तेव्हा ते मुळचे राजस्थानमधील असून चितोढगड या ठिकाणी एनआयएने कारवाई केली होती.  त्यात काही स्फोटके सापडली होती. त्या गुन्ह्यात हे तिघे संशयित होते. राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींनी त्यांना फरार घोषित केले आहे. त्यांना पकडणार्‍यास प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे, असल्याची माहिती समोर आली. राजस्थानमधून ते पुण्यात पळून आले असून गेल्या १५ ते १६ महिन्यांपासून ते पुण्यात राहत आहेत. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAnti Terrorist SquadएटीएसCourtन्यायालय