शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसलाय : आढळराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 2:37 PM

तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय, आढळराव पाटील यांचं वक्तव्य.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दिलीप लांडे हे ३८ वे आमदार त्यांच्या गटात गेल्यानंतर मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झाले होते. अनेक बंडखोर आमदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी यांची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करावं अशी मागणी केली होती. दरम्यान, आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीदेखील राष्ट्रवादीचा सर्वाधिक फटका आपल्यालाच बसला असल्याचं वक्तव्य केलं आहे.

“या तालुक्यात सर्वात जास्त, तालुकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा फटका कुणाला बसला असेल तर आम्हाला बसलाय, शिवसैनिकांना बसलाय. साधी गोष्ट सांगतो, गेल्या तीन दिवसांपासून ऐकतोय, १५०-२०० जीआर एक दोन दिवसांत काढलेत. पुणे जिल्ह्याच्या डीपीडीसीचा १७० कोटी रूपयांचा फंड एकतर्फी शिरूरच्या खासदारांना १५ कोटी, बारामतीच्या खासदाराला १८ कोटी, जुन्नरच्या आमदारांना १० कोटी, खेडच्या आमदारांना १२ कोटी अशा १७८ कोटींचे प्रस्ताव मंजूर करून सहीला गेलेत. जिल्हा परिषदेचे सदस्य नाही, मंत्री नाहीत, कोणाला काही विचारलं नाही, कोणाचं काही अपील नाही. हे काय सुरू आहे? किती आम्ही सहन करायचं याचा विचार व्हायला पाहिजे या मताचा मी आहे,” असं आढळराव पाटील म्हणाले. पुण्यातील चाकण येथे बोलताना त्यांनी यावर वक्तव्य केलं.

“कोणत्याही परिस्थिती शिवसेना एकत्र राहिली पाहिजे. आजही आपल्या पक्षावर संकट आलंय. सर्वांचीच जबाबदारी आहे, पण मी पुढे राहणार. पण बोटचेपी धोरण करता कामा नये. कशासाठी लोक तुमच्याकढे येतील, का उभे राहतील?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावPuneपुणे