शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचे काम केंद्र सरकारने केले; अमोल कोल्हेंची टीका, जनआक्रोश मोर्चाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2023 14:14 IST

केंद्राला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही, शेतकऱ्याचे प्रश्न मांडले की केंद्राला संसदेत गदारोळ वाटतो

जुन्नर :  कांद्याचे भाव पाडण्याचे तसेच शेतकऱ्यांच्या ताटात माती कालविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. आता लढायचं नाही तर रडायचं आपल्या हक्काचं ठणकावून घ्यायचं असा निर्धार  खासदार अमोल कोल्हे यांनी किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय शेतकरी जनआक्रोश मोर्चाच्या शुभारंभ प्रसंगी केला. किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवरायांना अभिवादन करत शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शेतकरी जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झाली.

 खासदार अमोल कोल्हे पुढे म्हणाले, संसदेमध्ये खासदार सुप्रिया सुळे व मी कांदा निर्यात बंदी विषयी चर्चा करत होतो. केंद्राला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही .शेतकऱ्याचे प्रश्न मांडले की केंद्राला संसदेत गदारोळ वाटतो. म्हणून आमचे निलंबन करण्यात आले. आमच्या भावना दडपणाचे काम संसदेत होते. म्हणून रस्त्या उतरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारचा कानावर पोहोचण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

 कांद्याचे दर वाढून शेतकऱ्याला  पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर निर्यातबंदी केली जाते. मागील काळात कांद्यावर चाळीस टक्के ४० टक्के निर्यात शुल्क लावल्यानंतर २४१० रुपये दराने शेतकऱ्यांचा कांदा विकत घेण्याची घोषणा सरकारने केली होती. यामध्ये किती शेतकऱ्यांचा कांदा विकत घेतला असा सवाल कोल्हे यांनी केला.  

टोमॅटो ,सोयाबीनला भाव मिळायल्या लागल्यावर नेपाळ वरून टोमॅटो आयात करण्यात आला तसेच ऑस्ट्रेलिया वरून कापूस आयात करण्यात आला. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या खतावर अठरा टक्के जीएसटी लावण्यात आला. खतावरील सबसिडी हजारो कोटींनी कमी करण्यात आली. शेतीत उत्पादन कमी आले तर शेती औषधे खते विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा देणारे केंद्र सरकार खत उत्पादक कंपन्याना मोकळे रान देतात.                

देशात मोजक्या उद्योगपतींचे 25 लाख कोटींचे कर्ज माफ करण्यात आले तर काही हजार रुपयांसाठी साठी शेतकरी आत्महत्या  करतो. महाराष्ट्रात 266 शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या आहेत. याची केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे अशी टीका कोल्हे यांनी केली. दूध दरवाढीचे अनुदान देताना शासकीय दूध संस्थांना दूध घालणारे शेतकरी व खाजगी दूध संस्थांना दूध घालणारे शेतकरी असा भेदाभेद न करता सरसकट सर्वांना अनुदान देण्याची  मागणी कोल्हे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकारParliamentसंसदFarmerशेतकरी