शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

Maharashtra Winter: राज्यातून ढगाळ वातावरण निवळले, आता हळूहळू वाढणार थंडी!

By श्रीकिशन काळे | Updated: December 30, 2024 18:22 IST

गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी एकदम गायब झाली होती, आता पुन्हा थंडीला सुरुवात होणार, हवामान विभागाचा अंदाज

पुणे: सध्या राज्यामध्ये पावसाचे वातावरण निवळले आहे. त्यामुळे तापमानात चढ-उतार होत आहे. गेल्या आठवडाभरात ढगाळ वातावरण आणि पावसामुळे थंडी एकदम गायब झाली होती. उत्तर भारतातील राज्यांमध्येही बहुतांशी ठिकाणी थंडी जाणवली नाही. पुढील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये पुन्हा थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला.

राज्यामध्ये सोमवारपासून (दि.३०) पुढील ३ दिवस म्हणजे गुरुवार दि. २ जानेवारीपर्यंत ऊबदार वातावरण हळूहळू कमी होत जाणार आहे. शुक्रवार (दि.३) पासून त्यापुढील पाच दिवसांसाठी म्हणजे मंगळवार, दि. ७ जानेवारीपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जाणवण्याची शक्यता आहे. त्यातही विशेषतः उत्तर महाराष्ट्र व उत्तर विदर्भातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत त्या पाच दिवसांत थंडीचा प्रभाव अधिक राहील. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही, असे खुळे यांनी सांगितले.

राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या परिसरापासून उत्तर गुजरातपर्यंत हवेचा कमीदाबाच्या पट्ट्याचीही निर्मिती झाली. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे आग्नेय अरबी समुद्रापासून दक्षिण महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झालेला आहे. यामुळे सध्या उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी कमी झालेली आहे. मागील आठवडाभरात राज्यात ढगाळ हवामानासह पावसानेदेखील हजेरी लावली होती. मागील तीन दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांत गारपीटही झाली होती, तर पावसानेदेखील पिकांना तडाखा दिला होता. त्यामुळे राज्यातील थंडी गायब झाली. उत्तर भारतातूनही थंडी वाऱ्यांचा प्रवाह काहीसा खंडित झाला होता. राज्यात आजही तापमानात चढ-उतार राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. तसेच पुढील काही दिवसांत पुन्हा थंडीला सुरुवात होऊ शकते, असेही खुळे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रTemperatureतापमानNatureनिसर्गenvironmentपर्यावरणSocialसामाजिक