शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

शेतजमीन वाटपाचा 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर सुटला

By नम्रता फडणीस | Updated: May 5, 2023 17:23 IST

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचल्यावर दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला

पुणे : थोरल्या भावाला पाच मुली. त्याला एकही मुलगा नव्हता. धाकट्या भावाला दोन मुले असल्याने त्याने आपला एक मुलगा भावाला दत्तक दयायचे ठरविले. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच दोन्ही भावांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये जमीन वाटपाबाबत वाद सुरू झाले. 1954 पासून सुरू झालेला वाद अखेर 70 वर्षानंतर लोकन्यायालयात मिटला.

 पूर्व हवेली तालुक्यातील कदम वाक वस्ती गावातील नावाजलेल्या शिवाजी पाटील (नाव बदललेले आहे) कुटुंबातील दोन सख्खे भाऊ. यामध्ये, थोरल्या भावाला पाच मुली व धाकट्या भावाला दोन मुले असल्याने थोरल्या भावाने एक मुलगा धाकट्या भावाला दत्तक देण्याचे ठरवले. कालांतराने पाच मुलींसह दोन मुलांचीही लग्न झाली. मात्र, दोन भावांमधील मुल दत्तक घेण्याबाबतची कायदेशीर प्रक्रिया राहून गेली. यादरम्यान, दोन्ही भावांचा मृत्यू झाल्यानंतर, 1954 सालापासून दोन्ही भावाच्या कुटुंबामध्ये शेतजमिनीवरून वाद-विवाद सुरू झाले.

तब्बल 70 वर्षात कुटुंबाच्या चौथ्या पिढीची संख्या 160 पर्यंत पोहोचूनही कुटुंबीय एकमेकांशी बोलत नव्हते.. यादरम्यान, दोन्ही कुटुंबियांनी न्यायालयात एकमेकांविरोधात वाटपाचा दावा दाखल केला. शेतजमिनीचा वाद लोकन्यायालयात आल्यानंतर अॅड. वैभव धायगुडे-पाटील यांनी त्यामध्ये, कुटुंबियांच्या 23 बैठका घेत समुपदेशन केले. त्यानंतर कुटुंबातील चौथ्या पिढीतील तरुण सदस्यांनी पुढाकार घेऊन ज्येष्ठांची समजूत काढली. मागील 70 वर्षांपासून सुरू असलेला वाद लोकन्यायालयात निकाली निघाल्याने कुटुंबियांसह न्यायाधीश पुराड उपाध्ये यांनीही समाधान व्यक्त केले. याप्रकरणात, अॅड. संदीप कुडते, अॅड. शरद आखाडे, अॅड. प्रतीक्षा कांबळे आणि अॅड. बलराज सपाटे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारCourtन्यायालयFarmerशेतकरीSocialसामाजिक