शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

सरकार देतेय ना,मग घ्यायचे ! पुढचे पुढे बघू; तब्बल २१ लाख बनावट शेतकऱ्यांना केंद्राचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 1:28 PM

ई-केवायसी पूर्ण न केल्याने डिसेंबरच्या हप्त्याला मुकणार : सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी

नितीन चौधरी

पुणे : सरकार देतेय ना,मग घ्यायचे ! पुढचे पुढे बघू. या मानसिकतेतून राज्यातील लाखो शेतकरीकेंद्र सरकारकडून वर्षाला मिळणाऱ्या ६ हजारांचे अनुदान आजवर लाटत आले. मात्र,आता डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यासाठी ई-केवायसी असलेल्याच शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. परिणामी राज्यातील तब्बल २१ लाख बनावट शेतकऱ्यांना दणका बसला आहे. यात सर्वाधिक १ लाख ७३ हजार बनावट शेतकरी सोलापूर जिल्ह्यात आहेत.

पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना ३१ मार्च २०१९ रोजी सुरू केली. याच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून देण्यात येणारी एकूण सहा हजाराची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात प्रती २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जात आहे. हे अनुदान थेट खात्यात जमा केले जात आहे. सुरुवातीला यात सरसकट अनुदान दिले जात होते. नंतर त्यात बदल करून शेती नावावर असलेले मात्र,प्राप्तिकर भरणारे,सरकारी कर्मचारी व अधिकारी,मोठे शेतकरी अशांना हे अनुदान मिळणार नाही, असे स्पष्ट केले गेले. त्यानुसार या सर्व शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सर्वच शेतकऱ्यांना अनेकदा मुदतवाढ दिली. मात्र,पात्र नसल्याने लाखो शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जे शेतकरी ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत अशांना अनुदान मिळणार नाही,असे वारंवार सांगूनही या शेतकऱ्यांनी ते केले नाही. ई-केवायसी न केल्यास आणि पात्रता निकषात नसणाऱ्या शेतकऱ्यांकडून अनुदान परत घेतले जाईल,असा इशारा देऊनही राज्यातील सुमारे २१ लाख २ हजार ९०८ शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही.

या अनुदानाचा १२ वा हप्ता म्हणून,१६ हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला. याच वेळी अशा शेतकऱ्यांचे अनुदान देता येणार नाही,असे केंद्र सरकारने बजावले होते मात्र,अनेक राज्यांच्या विनंतीनंतर केंद्राने हा १२ वा हप्ता १७ ऑक्टोबर रोजी वितरित केला. मात्र,डिसेंबरमधील हप्त्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केले आहे. तशा आशयाचे पत्रच केंद्र सरकारने राज्यांना पाठवले. त्यामुळे राज्य सरकारने ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आता शेवटची मुदत म्हणून महिनाअखेर ई-केवायसी करण्याचे बंधन घातले आहे. त्यासाठी सर्व संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांना ई-केवायसी शक्य तेवढे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

''ई-केवायसी पूर्ण न केलेल्यांमध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी,वकील,डॉक्टर,प्राप्तीकर भरणारे आहेत. तसेच १० टक्के खरे शेतकरी देखील आहेत. ई-केवायसी पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे. - वरिष्ठ अधिकारी,कृषी विभाग''

जिल्हानिहाय ई-केवायसी पूर्ण न केलेले शेतकरी

रायगड - १३,२०९वाशिम - १९,६३७भंडारा - २८,७९२गडचिरोली - २१,४२०सातारा - ६४,२०६गोंदिया - ३५,७३०नाशिक - ६५,९२९चंद्रपूर - ४२,३१८लातूर - ४८,८८१उस्मानाबाद - ४४,४०६जळगाव - ७३,०३९हिंगोली - ३३,३६७वर्धा - २६,५७७नगर - १,१३,३६३नंदुरबार - २२,०४४परभणी - ५९,६३८नांदेड - ८६,४०५कोल्हापूर - ९४,७१६औरंगाबाद - ७९,०५१सिंधुदुर्ग - २९,७३८अमरावती - ६५,२२०बुलढाणा - ७९,०३२पुणे - १,०५,३८८रत्नागिरी - ३८,९१९धुळे - ४२,०८७यवतमाळ - ७४,८८०जालना - ८०,३७७अकोला - ५२,६०६पालघर - २७,१५३सांगली - १,१७,१५८नागपूर - ५१,४२७सोलापूर १,७३,४४७बीड - १,४०,५५०ठाणे - ५२,१९८

एकूण २१,०२,९०८

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारMONEYपैसाSocialसामाजिक