शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
2
ट्रम्प आणि हार्वर्ड विद्यापीठातील संघर्ष शिगेला! विद्यापीठाने ट्रम्प प्रशासनावरच भरला खटला; वाद काय?
3
तुमच्याकडे ५०० रुपयांची नोट खरी आहे की खोटी? गृह मंत्रालयाने इशारा दिला
4
वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ
5
बापरे! भारतात नव्हे तर जगात चंद्रपूर शहर ठरले सर्वात उष्ण; एप्रिलमध्येच पारा ४५.६ अंश
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२५: कोणत्याही कामात यश मिळेल, आर्थिक फायदा होईल
7
अधिकारांत हस्तक्षेप करीत असल्याचे आमच्यावर आरोप; न्या. भूषण गवई यांनी नोंदवले निरीक्षण
8
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसमोर जवाहरलाल दर्डा यांचा पुतळा; आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण
9
GST सह सोन्याचा दर पोहचला १,००,००० प्रति तोळा; ग्राहकांना २० टक्के परतावा
10
रस्ते काँक्रिटीकरणामुळे खड्डे भरण्याच्या खर्चात १४० कोटींची घट; यंदा ७९ कोटींचीच निविदा
11
धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचं निधन; भारतात २२ ते २४ एप्रिल असा ३ दिवस राष्ट्रीय दुखवटा
12
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी नवी मुंबई पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांवर ताशेरे
13
२१ वर्ष पूर्ण झालेल्या नव्याने पात्र ठरणाऱ्या ‘लाडक्या बहिणीं’ना केव्हा मिळणार लाभ?
14
विमानतळावर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना नाहक त्रास नको; हायकोर्टाने कंपन्यांना फटकारले
15
कुजबुज! ठाकरे बंधूंना टक्कर देण्यासाठी शिंदे ब्रँडचेही सोशल मीडियावर ब्रँडिंग सुरू
16
प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
17
क्रांतिकारी मेंढपाळ गेला! अत्यंत मृदू आणि अतूट श्रद्धेचा एक स्वर कायमचा शांत झाला
18
चॅटजीपीटीचा वापर करून २ बहिणींनी केली कमाल; वाचवले तब्बल १० हजार डॉलर्स
19
‘पॉवर’ दाखवा, पृथ्वीला मूठभर अब्जाधीशांच्या आर्थिक दादागिरीतून सोडवा!
20
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...

Mahatma Gandhi Jayanti: गांधीजी-कस्तुरबांच्या सहजीवनाची हृद्य अखेर पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 14:51 IST

इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला, भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला, तेव्हा गांधीजींना आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले

ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये आणले. कस्तुरबा गांधी त्यांच्यासमवेत होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाडाची काडे करणाऱ्या आपल्या थोर पतीचा दीर्घ सहवास या निमित्ताने प्रथमच कस्तुरबांना मिळाला. त्या समाधानातच बहुधा त्यांनी याच आगाखान पॅलेसमध्ये आपले डोळे मिटले. त्यावेळी हा थोर महात्मा बराच काळ उदास झाला होता.

महात्मा गांधी व कस्तुरबा यांचे सहजीवन आदर्श असेच होते. कस्तुरबांनी आपल्या जगावेगळ्या पतीचे मोठेपण मान्य करत त्यांच्या कार्यात स्वत:ला समर्पित केले होते; तर जगाला सत्याचे प्रयोग करून दाखवणाऱ्या महात्मा गांधी यांनी आपल्या पत्नीच्या शब्दांना नेहमीच मान देत आदर केला. त्यांच्या या आदर्श सहजीवनाची अखेर पुण्यात झाली.

या पत्नी-पत्नींना इंग्रज सरकारने आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे त्यांच्या या सहजीवनाचा अल्पकाळ का होईना, आगाखान पॅलेस साक्षीदार झाला, मात्र कस्तुरबांचे निधन आपल्याच आवारात होईल व या सहजीवनाची अखेर आपल्याला पाहावी लागेल, अशी कल्पनाही पॅलेसने केली नसेल.

मात्र तसेच झाले. इंग्रज सरकारला महात्मा गांधीजींनी १९४२ मध्ये ‘चले जाव’चा आदेश दिला. भारतीयांना त्यांनी ‘करो या मरो’चा संदेश दिला. देशभर चळवळ सुरू झाली. इंग्रजांनी सर्व नेत्यांना अटक केली. गांधी वगळता सर्व नेत्यांनी त्यांनी अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यात पाठवले. महात्मा गांधींना मात्र पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले. कस्तुरबांना त्यांच्यासमवेत देण्यात आले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांना या पॅलेसमध्ये आणले गेले. त्यांच्यावर इंग्रज पोलिसांची सक्त नजर होती. त्यांना त्यांचे दैनंदिन काम करण्यात कोणताही अडथळा नव्हता, मात्र कोणतीही राजकीय कृती करण्यास त्यांना मनाई होती.

पुढे २२ फेब्रुवारी १९४४ पर्यंत (याच दिवशी कस्तुरबांचे निधन झाले.) हे दाम्पत्य आगाखान पॅलेसमध्येच नजरकैदेत होते. महादेवभाई देसाई हे गांधींजींचे लेखनिकही त्यांच्यासमवेत होते. कस्तुरबांना या निमित्ताने पतीचा सहवास मिळाला. महादेवभाईंनी त्यांच्या दैनंदिनीत दोघांच्याही दिनचर्येविषयी लिहिले आहे. दोघेही एकमेकांचा कसा सन्मान ठेवत याचे उल्लेख त्यात आहेत. महात्मा गांधीजींचे मोठेपण कस्तुरबांनी लक्षात घेतले होते, मात्र तरीही पती म्हणून त्यांच्या गांधीजींकडून अपेक्षा होत्या. गांधीजी त्यांचा आदर करत.

कस्तुरबा आजारी पडल्या, त्यावेळी नेहमी स्थितप्रज्ञ असलेले महात्मा गांधीही सैरभैर झाले होते. नैसर्गिक उपचार करायचे की डॉक्टरचे यावर त्यांची त्यांची स्वत:ची अशी मते होती. अखेर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी कस्तुरबांची प्राणज्योत मालवली. गांधीजी त्यादिवशी खिन्न झाले होते. कधी नव्हे ते त्यांच्या मुद्रेवरचे प्रसन्न हास्य मावळले होते.

                                                                                                                                                - राजू इनामदार 

टॅग्स :PuneपुणेMahatma Gandhiमहात्मा गांधीhusband and wifeपती- जोडीदारSocialसामाजिकIndiaभारतFamilyपरिवार