शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

हिंदीच्या सक्तीमागे हिंदी, हिंदू, हिंदुराष्ट्र असा विचार - हर्षवर्धन सपकाळ

By राजू इनामदार | Updated: April 19, 2025 20:36 IST

पाचवीनंतर इंग्रजी आवश्यक, हिंदी ऐच्छिक, त्यानंतर इयत्ता आठवीत संस्कृत; पण तेही ऐच्छिक असे आहे.

पुणे : हिंदी भाषेची इयत्ता पहिलीपासूनची सक्ती अशास्त्रीय आहे, यामागे भारतीय जनता पक्षाचा हिंदी, हिंदू, हिंदुराष्ट्र, असा विचार आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. इयत्ता पाचवीपासून हिंदी व पुढे तर संस्कृत व नंतर अन्य भाषांचा अभ्यास करता येत असतानाही ही सक्ती कशासाठी? असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला.

सपकाळ यांनी शनिवारी दुपारी लोकमत कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी झालेल्या वार्तालापात त्यांनी शालेय अभ्यासक्रमात केंद्र सरकारने लागू केलेल्या व राज्य सरकारने स्वीकारलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला. सपकाळ म्हणाले, ‘सध्या इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय अभ्यासक्रमात आहेच. त्यानंतर इयत्ता आठवीपासून संस्कृत विषयही आहे. त्यापुढे अन्य भाषांचा, इतकेच काय; पण परदेशी भाषांचाही अभ्यास करता येतो. मग इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेचा सक्ती करण्याचे धोरण कशासाठी? असा प्रश्न आहे.’

सक्ती करणेच अशास्त्रीय आहे, हे स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले, ‘लहान मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी मुळात ० ते ६ वर्षांपर्यंत मुलांना कसलाही शालेय अभ्यास, परीक्षा देऊ नये, असे म्हटलेले आहे. असे असताना वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच मुलांना केजी, सिनिअर केजी करायला लावले जाते. हा निव्वळ व्यवसाय झाला आहे. मुलांच्या मेंदूचा विकास होण्यास, अभ्यास करण्याची क्षमता येण्यास वयाच्या ६ व्या वर्षानंतर समज येते. त्यानंतरच शालेय विषय सुरू व्हावेत, असे आहे. त्यात अशी सक्ती करणे व तीसुद्धा भाषा विषयाची, हे योग्य तर नाहीच, शिवाय अशास्त्रीयच आहे.’

आपल्या स्वत:च्या मुलांचे उदाहरण देत सपकाळ म्हणाले, ‘दोघेही साध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत मराठी माध्यमातून शिकले. पुढील शिक्षणात त्यांना कसलीही अडचण आली नाही. आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे काम ते करू शकतात.’ हिंदी भाषेची सक्ती करण्याचा विचार तसाच पुढे आलेला नाही, तर त्यामागे हिंदी, हिंदू व हिंदुराष्ट्र, असा विचार असल्याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला. तीन भाषांचे सूत्र देशाने स्वीकारले आहे. मात्र, त्यात कुठेही सक्ती नाही. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण व पुढे इयत्ता पाचवीनंतर इंग्रजी आवश्यक, हिंदी ऐच्छिक, त्यानंतर इयत्ता आठवीत संस्कृत; पण तेही ऐच्छिक असे आहे. असे धोरण असताना आता त्यात हिंदी भाषेची सक्ती व तीसुद्धा इयत्ता पहिलीपासून यामागे तोच विचार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेसBJPभाजपा