शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

पुरंदरचे विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 16:50 IST

छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करणार असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले

सासवड : पुरंदर तालुक्यात होणारा छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच करणार असल्याचे सांगत अडीच हजार कोटींची तरतूद लाॅजिस्टिक पार्कसाठी केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर शिवसेनेच्या वतीने मतदारांच्या आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या अध्यक्षा नीलम गोऱ्हे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शहर प्रमुख नाना भानगिरे, ईरफान सय्यद, जिल्हा उपप्रमुख रमेश कोंडे, आळंदी शहर शिवसेनाप्रमुख राहुल चव्हाण, शाखाप्रमुख नितीन ननवरे, महाराष्ट् चर्मकार संघाचे अध्यक्ष महादेव पाखरे, रमेश इंगळे, राजेश दळवी, माजी सरपंच गणेश मुळीक, हरिभाऊ लोळे, समीर जाधव, माणिक निंबाळकर, ममता शिवतारे उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, तमाम लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, तरुण, ज्येष्ठ नागरिक या लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, समाधानाचे व धडाकेबाज निर्णय घ्यावे लागतात. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले. परंतु लाडक्या बहिणीने निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. विरोधी पक्ष नेता होईल तेवढे पण संख्याबळ त्यांच्याकडे राहिले नाही. विरोधकांचा लाडक्या बहिणी सुपडा साफ करून टाकला, या महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला.विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम राखायचे असून त्यासाठी सदस्य नोंदणी अभियानाला तात्काळ गती द्यावी, असे आवाहन केले. आमदार, खासदार यांनी पक्ष बांधणीकडे विशेष लक्ष द्यावे आणि या तालुक्यातील जेजुरी तसेच सासवड या दोन्ही नगरपरिषदेच्या ठिकाणी शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवावा, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री पुरंदरमध्ये येऊन कोणत्या घोषणा करणार, याकडे सर्वांचेच लक्ष असतानाच सभेला मात्र अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची चर्चा विरोधकांकडून केली जात आहे. सात गावातील महिला सरपंचांचे शिष्टमंडळ विमानतळ विरोधी निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यास गेले असता, त्यांना यावेळी अडवण्यात आले.फेसबुक लाईव्हने राज्य चालत नाहीकाहींनी घरात बसून राज्य चालवण्याचा प्रयत्न केला. फेसबुक लाईव्ह करून हे राज्य चालत नाही. कार्यकर्त्यांसाठी जनतेत जावे लागते. कार्यकर्त्यांच्या जीवावर सत्ता मिळते व त्यामधून राज्य चालते. कार्यकर्ता अडचणीत असेल तर त्यासाठी गावात गल्लीबोळामध्ये जावे लागते. घरात बसून राज्य चालवता येत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, त्यांना जनतेने घरात बसवले असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEknath Shindeएकनाथ शिंदेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाAirportविमानतळ