शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

रणवाद्यांवर ‘ती’ची हुकूमत! ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 09:22 IST

रणवाद्यांवर आता ‘ती’ हुकूमत गाजवतेय. ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये, हाच संदेश यातून मिळतोय.

श्रीकिशन काळे, वरिष्ठ उपसंपादक  

जिच्या मनगटात दम तोच वाजवेल ढोल-ताशा’ असे पूर्वी म्हटले जायचे. मुली कशा नाजूक, फुलांसारख्या कोमल. त्यांना एवढा मोठा ढोल पेलवेल का? त्यांच्या हातात ढोल वाजवायला शक्ती तरी असते का? अशा अनेक प्रश्नांना मुलींनी ढोलवादनातून सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात ढोलवादनात मुलींची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे आता तर गणेशोत्सव मिरवणुकीत ढोल-ताशा वादनामध्ये मुलींचीच पथके अधिक पाहायला मिळतात. त्यामुळे पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या रणवाद्यांवर आता ‘ती’ हुकूमत गाजवतेय. ‘ती’ला कोणीही कमी लेखू नये, हाच संदेश यातून मिळतोय.

ढाेल पथकांची मुहूर्तमेढ रोवली होती ती मुळशी-मावळातील ग्रामीण पथकांनी. हेदेखील तितकेच महत्त्वाचे होते. आज मुलांसोबतच पुण्यात मुलींचा संघ असलेली अनेक ढोल-ताशा पथके प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये शिवमुद्रा, शिवगर्जना, श्रीराम, शौर्य, नादब्रह्म, रुद्रगर्जना यांसारख्या ढोल पथकांचा समावेश आहे.

ढोल-ताशाचे अर्थकारण काय? लोकांंना वाटते की, ढोल-ताशामध्ये खूप पैसा असेल; पण तसे काही नाही. बँडवादक हे पोटासाठी वाजवतात. ढोल-ताशा पथकांचे तसे नाही. पथकांमध्ये हौस म्हणून वाजवायला येतात. केवळ आनंद मिळावा आणि गणरायाला सेवा द्यावी म्हणून तरुण-तरुणी येतात. जर एका वादनाचे शंभर रुपये मिळाले, तर त्यातील ३० टक्के खर्च ढाेलाच्या पानावर, टिपरे, फस्ट एड बॉक्स यावर होतो. वाहतुकीवर २० टक्के, तर वादकाच्या जेवणखाण, पाण्यावर २० टक्के खर्च होतो. इतर दहा टक्के खर्च येतो. मग खाली केवळ २० टक्के मार्जिन राहते. ते देखील चांगले पथक असेल तरच. पथकांना सर्व ठिकाणी सारखे पैसे मिळत नाहीत. कुठे कमी, तर कुठे जास्त मिळतात.- पराग ठाकूर, अध्यक्ष, अखिल ढोल-ताशा वादन महासंघ, पुणे

ढोल पथकाचा अनोखा इतिहास? डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे म्हणजेच अप्पासाहेब पेंडसे यांनी पुण्यात ज्ञानप्रबोधिनी प्रशाला या शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम ढोल-ताशा पथकाला सुरुवात केली. 

मुलींचा सहभाग कधीपासून? ज्याच्या मनगटात ताकद त्यांनीच हे वाद्य वाजवावे, अशी धारणा होती. मुली अतिशय सुंदर ढोल वाजवू लागल्या. ताशा आणि ध्वजामध्येही त्या कमी पडल्या नाहीत. खरंतर ताशा वाजवायला खूप अवघड असतो; पण त्यातही मुली पारंगत झाल्या. आज केवळ महिला असलेली अनेक पथके आहेत. आम्ही २००० सालीच महिलांना पथकांमध्ये स्थान दिले होते, अशी माहिती अखिल ढोल-ताशा पथक महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी दिली.

१९६५ मध्ये पुण्यात गणेशोत्सवात दंगल झाली होती. त्यामुळे पोलिसांनी मिरवणुकीमध्ये वाद्य वाजविण्यासाठी सक्त मनाई केली होती; परंतु पोलिसांच्या या निर्णयाला अप्पासाहेबांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर स्वत: गळ्यात ताशा घेऊन ते लक्ष्मी रोडच्या चौकामध्ये आले आणि तिथे उभे राहून त्यांनी वादन सुरू केले. पुणेकरांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. नंतर १९७५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी शाळेत पहिले ढोल पथक स्थापन झाले. 

सांस्कृतिक परंपरेला सुरुवातढोल-ताशाचा संबंध आपल्याकडे प्राचीन काळापासून पाहायला मिळतो. युद्धामध्ये रणवाद्य म्हणून ढोलाकडे पाहिले जाते. तेव्हा अतिशय शक्तिशाली असणाऱ्या पुरुषाला हे वाद्य वाजविण्याचा मान मिळत असे. ढोल-ताशा, शंख-झांजा आणि ध्वज यामुळे आपल्या वादनातून एका अर्थाने आपली सांस्कृतिक परंपरा निर्माण झाली. १८९४ मधील विसर्जन मिरवणुकीत पुण्यात १२० गणपती होते. त्यावेळी लेझीम, घुंगरू, चौघडे अशा मंगलमय सुरांमध्ये गणपतींचे विसर्जन झाले होते. त्यानंतर गणपतीपुढे ढोल-लेझीमच्या ताफ्यांमुळे मिरवणुकीचा दिमाख आणखी वाढला; परंतु १९६५ च्या उत्सवामध्ये युद्ध आणि दंगलींमुळे गालबोट लागले. तेव्हा मिरवणुकीत ढोल-लेझीमला बंदी घालण्यात आली. मावळ-मुळशी या भागात तरुणांनी ढोल-ताशा पथके स्थापन करायला सुरुवात केली होती; तसेच उत्सवात घातक प्रथाही सुरू होऊ लागल्या होत्या. 

नव्या प्रथांनी अस्वस्थ होऊन ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक (कै.) अप्पासाहेब पेंडसे यांनी कोंढणपूरच्या गुलाबराव कांबळे या ताशावादकाला जत्रेमध्ये पाहिले. या कलाकाराला बरोबर घेऊन शिस्तबद्ध शालेय पथकांची जोड देऊन मिरवणुका ताल-सुरांत रंगवू शकतो, अशी मनोकामना पेंडसे यांची होती. या पथकांना शिस्तबद्ध अनुशासनाची जोडदेखील मिळेल म्हणून पेंडसे यांनी १९६५ च्या सुमारास ज्ञानप्रबोधिनीच्या ‘बर्ची-भाला-ध्वज’ पथकाची स्थापना केली. तेव्हापासून पुण्यात ढोल-ताशा पथकाला प्रारंभ झाला. 

 

टॅग्स :WomenमहिलाGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधी