शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

किस्सा निवडणुकीचा! वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी नवी ओळख कशी मिळाली?

By राजू इनामदार | Updated: November 7, 2024 15:37 IST

राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं तेव्हा नाईक यांनी 'महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल' असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होत

पुणे: महाराष्ट्राचे सलगपणे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखतात. पाईप ओढणारे ( धुम्रपानातील पाईप) त्यांचे छायाचित्र अजूनही प्रसिद्ध होत असते. ते पट्टीचे शिकारी. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी निशाणा साधत नाही असे ते नेहमी सांगत. असे वसंतराव नाईक पुण्यात कायम येत असत. काँग्रेसशिवाय त्यांचा बराच मोठा निकटचा मित्र परिवार पुण्यात होता.

राज्यातील हरित क्रांतीचे जनक म्हणून नंतर त्यांची ओळख प्रस्थापित झाली. त्याची सुरूवात पुण्यातील एका प्रचारसभेतून झाली असे माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितले. पवार त्यावेळी युवक काँग्रेसचे काम करत. त्यानिमित्ताने त्यांचे सतत मुंबईत जाणेयेणे होत असे. त्यातूनच त्यांची वसंतराव नाईक यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. पवार यांनी सांगितले की नाईक यांना शेतीबद्दल प्रचंड प्रेम होते. मंत्रालयात असताना मुंबईत पहिला पाऊस झाला की लगेच खिशातून १०० रूपये काढत व शिपायाला देत, पेढे आणा व वाटा असे सांगत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी ही पद्धत कायम ठेवली.

एका विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला ते आले होते. त्यावेळी मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांसाठी शनिवारवाड्याचे पटांगण हेच एकमेव ठिकाण होते. सगळ्याच नेत्यांच्या सभा तिथे होत. वसंतराव नाईकांचीही सभा तिथे झाली. त्यावेळी राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं होतं. दुसऱ्या राज्यावर अवलंबून रहावं लागत होतं. वसंतराव नाईकांना याची खंत होती. त्या सभेत बोलताना अचानक त्यांनी सांगितले की महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल.

प्रचारात बोललेले वाक्य म्हणून काही दिवसांनी सगळे ते विसरूनही गेले. नाईक मात्र ते विसरले नव्हते. त्यानंतर शेतीशी संबधित सर्वच विषयांवर त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष दिले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. सिंचनाची जास्तीतजास्त व्यवस्था कशी होईल याकडे लक्ष दिले. शेतीतज्ञांचा सल्ला थेट शेतकऱ्यापर्यंत पोहचेल अशा सुचना शेतीखात्याला दिल्या. त्यासाठी तज्ञ उपलब्ध करून दिले. आधुनिक शेतीची माहिती थेट शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घेतली.

या सगळ्या मोहिमेचा परिणाम म्हणून पुढच्या काही वर्षातच राज्याचे शेतीचे उत्पादन वाढले. सिंचनाखालील शेतीक्षेत्र वाढले. आधुनिक शेतीचा वापर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून होऊ लागला व महाराष्ट्र खरोखरच अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालाच, शिवाय इतर राज्यांना मदतही करू लागला. त्यातूनच वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी नवी ओळख मिळाली.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chief Ministerमुख्यमंत्रीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसFarmerशेतकरी