शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

चाकण, मोई, निघोजेतील नाले करताहेत ‘इंद्रायणी’ला प्रदूषित; MIDC चे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 12:35 IST

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीएमआरडीए, एमआयडीसी आणि नगरपालिका इतर आस्थापनांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत...

- विश्वास मोरे

पिंपरी :इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत 'लोकमत'ने आवाज उठवल्यानंतर प्रदूषण महामंडळाच्या वतीने नदीतील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये चिखली, चिंबळी ते आळंदी परिसरातील सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित झाल्याचे आढळून आले आहे. पाण्यातील बीओडी आणि सीओडी, तसेच डिटर्जंट आणि फॉस्फरसचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीएमआरडीए, एमआयडीसी आणि नगरपालिका इतर आस्थापनांना उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र मानल्या जाणाऱ्या देहू आणि आळंदी परिसरातून इंद्रायणी नदी वाहते. नदीच्या दोन्ही बाजूंना नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. दिनांक २ ते १५ जानेवारीपर्यंत इंद्रायणी नदी फेसाळत होती. याबाबत 'लोकमत'ने आवाज उठवला होता, तसेच पर्यावरणवादी संघटनांनी नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी केली होती.

याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराच्या बाजूने रसायनयुक्त पाणी नदीत जात नसल्याची खातरजमा महापालिकेने केली होती. मात्र, विरुद्ध भागात असणारे नाले थेटपणे नदीत सोडल्याचे दिसून आले.

या भागातील नाल्यांमुळे होते प्रदूषण

इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास निघोजे, मोई, चिंबळी या परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेले नागरीकरण कारणीभूत आहे, तसेच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर छोटे-मोठे उद्योग सुरू झाले आहेत आणि या उद्योगांचे पाणी कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात आहे. या भागातील सांडपाण्यामुळे नदीचे प्रदूषण अधिक होत असल्याचे पर्यावरणवादी संघटनांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. या भागातील पाण्याच्या प्रदूषणावर कारवाई करायची कोणी, हा मोठा प्रश्न आहे.

इंद्रायणी नदीवरील चिखली, चिंबळी आणि आळंदी या तीन भागांतील बीओडी, सीओडी, डीओ, डिटर्जंट आणि फॉस्फरेट अशा पाच गोष्टींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डिटर्जंट आणि फॉस्फरेटचे प्रमाण, तसेच सीओडीचे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून येत आहे.

इंद्रायणी नदी फेसाळली आहे, याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आम्ही तीन ठिकाणच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आलेला आहे. त्यामध्ये अधिकाधिक प्रदूषण हे डिटर्जंटचे असल्याचे दिसून आले, तसेच सीओडी, बीओडी वाढल्याचे दिसून आले. या परिसरात नदीच्या परिसरातील नाल्यांची तपासणी प्रशासनाने करण्याची गरज आहे, तसेच त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. सांडपाणी नदीमध्ये जाणारे सांडपाणी रोखले तर प्रदूषण कमी होणार आहे.

- मंचक जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळ, अधिकारी

टॅग्स :indrayaniइंद्रायणीPuneपुणेwater pollutionजल प्रदूषण