शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

रायगडचा अपरिचित इतिहास उलगडणार

By श्रीकिशन काळे | Updated: March 17, 2025 10:09 IST

रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे.

पुणे : स्वराज्याची राजधानी असलेला रायगड शिवकाळात कसा होता, तो दिसायचा कसा? त्याविषयीचे गुपित मोडी लिपीमध्येच दडलेले होते; पण आता हजारो मोडी लिपीच्या कागदपत्रांमधून त्यावेळचा रायगड प्रत्यक्षात कसा होता, ते थ्रीडीमधून शिवप्रेमींना अनुभवता येणार आहे, तसेच रायगडाचा इतिहास पुस्तक रूपातून देखील समोर येईल.

रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे. पुणे पुरालेखागारातील रायगडच्या हजारो मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून इतिहास संशोधक व मोडी लिपीतज्ज्ञ राज चंद्रकांत मेमाणे हे पुस्तक वाचकांच्या समोर घेऊन येत आहेत.  

याविषयी दुर्ग अभ्यासक-इतिहास संशोधक राज मेमाणे म्हणाले की, इसवी सन १७७३ ते १८१८ या कालावधीत पेशव्यांकडे रायगडचा कारभार होता. या कालावधीतील मोडी कागदपत्रांवर आधारित हे पुस्तक आहे. यातील काही कागदपत्रांवर आधारित संशोधन  यापूर्वी प्रकाशित झालेले आहे; परंतु ते अपूर्ण असून, महाराजांचा रायगड या पुस्तकात पूर्ण होणार आहे. त्यातून रायगडच्या अनेक अपरिचित पैलूंवर प्रकाश पडणार आहे. रायगड येथील शिवकालीन वास्तू जसे की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा, महाराजांची तख्ताची सदर, विवेकसभा, कोठार आदी इमारतींचे बांधकाम कसे होते, त्यांची दुरुस्ती व बांधकाम कसे केले जात असे, आदींचे वर्णन कागदपत्रांमधून सापडते. 

थ्रीडी आराखडा मोडी कागदपत्रांतून किल्ले रायगडवरील बांधकामाच्या वर्णनावरून तसेच वापरलेल्या वस्तू यावरून त्रिमितीय (थ्रीडी) आराखडा दुर्ग अभ्यासक इतिहास संशोधक प्रसाद दांगट पाटील हे बनवत आहेत.भविष्यात रायगडवरील इमारतींचे पुनर्निर्माण झाल्यास या मोडी कागदातील माहितीचा आणि त्रिमितीय आराखड्याची मोठी मदत होणार आहे.वाडेश्वर मंदिराच्या बांधकामाला १७०० कौलेकुशावर्त तलावावरील वाडेश्वर मंदिराच्या बांधकामाला तेव्हा १७०० कौले लागली होती. त्याचप्रमाणे रायगडावर वास्तू, दरवाजे, बुरूज, पहारे आदी कोठे होते? याची माहिती या कागदपत्रांमधून समोर आली आहे. 

टॅग्स :RaigadरायगडFortगड