शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आगीतील बाधितांची आता आश्वासनांनी पुन्हा होरपळ; पाच पैशांचीही मदत नाही

By राजू इनामदार | Updated: December 21, 2023 18:10 IST

टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते

पुणे: टिंबर मार्केटमध्ये २५ मे २०२३ च्या रात्री लागलेल्या आगीत बाधीत कुटुंबे व व्यावसायिकांना सरकारकडून वारेमाप आश्वासने मिळाली, मदत मात्र एका पैशाचीही अद्याप मिळालेले नाही. त्या नैसर्गिक आगीत १२ कुटुंबे व ७ व्यावसायिकांचे बरेच मोठे आर्थिक नुकसान झालेच, पण त्यानंतर आता आश्वासनांच्या आगीतही त्यांची होरपळच होते आहे.

भवानी पेठेतील टिंबर मार्केट ( लाकूड बाजार) मध्ये वारंवार आग लागत असते. या मार्केटला लागूनच रहिवासी घरे आहेत. हा सर्व परिसर बराच जुना आहे. २५ मे ला अशीच आग लागली. त्यामध्ये ७ दुकानदार व १२ कुटुंबांच्या घराचे बरेच नुकसान झाले. सुदैवाने जिवीतहानी झाली नाही, मात्र आर्थिक नुकसान झाले. अशी आग लागल्यानंतर लगेचच तिथे अधिकारी, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी सुरू होतात, सांत्वन केले जाते व मुख्य म्हणजे बरीच आश्वासने दिली जातात.या आगीनंतरही तेच झाले असे तेथील एक बाधित चेतन अगरवाल यांनी सांगितले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह बऱ्याच राजकीय व्यक्तींनी भेट दिली. जिल्हाधिकारीही आले. तिथेच बाधितांना त्वरीत मदत करण्याचा निर्णय झाला. अशा नैसर्गिक आपत्तींमध्ये नुकसान झालेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून तातडीची मदत करण्याचा कायदा आहे. त्यानंतर पंचनामा वगैरे करून नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते व त्याप्रमाणे मंत्रीमंडळाकडे प्रस्ताव पाठवून मंजूरी घेत आर्थिक मदत केली जाते.

या आगीत तहसील स्तरावर पंचनामे झाले आहेत. भेटीदरम्यान मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही त्वरीत मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता ६ महिने होत आले तरीही सरकारदरबारी यावर काहीच हालचाल नाही. स्थानिक राजकीय पदाधिकाऱ्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे सर्व बाधित संतापले असून आता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढूनच मागणी करण्यात येईल असे अगरवाल यांनी सांगितले ती वेळ येऊ द्यायचे नसेल तर तातडीने मदत केली जावी अशी बाधितांची मागणी असल्याचे अगरवाल म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेfireआगWaterपाणीSocialसामाजिकGovernmentसरकार