शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

...तर आपच्या २२ ही जागा आल्या नसत्या : बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 12:37 IST

काँग्रेसची साथ घेतली नाही, म्हणून आप पक्ष वाचला. ते दोघे एकत्र लढले असते तर सर्व ७० जागा भाजपच्या आला असत्या

पुणे : काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) वेगळे लढल्याने भाजपला फायदा झाला, असे म्हणण्यात काही तथ्य नाही. महाराष्ट्रात सर्व एकत्र होते, काय फरक पडला. काँग्रेससोबत आप पक्ष लढला असता तर त्याच्या २२ सुद्धा जागा निवडून आल्या नसत्या. काँग्रेसची साथ घेतली नाही, म्हणून आप पक्ष वाचला. ते दोघे एकत्र लढले असते तर सर्व ७० जागा भाजपच्या आला असत्या, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेस बावनकुळे यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. समवेत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, दिल्लीत भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. दिल्लीतील ७० पैकी ४८ जागांवर भाजपला विजयी करून दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर विश्वास टाकला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व जे. पी. नड्डा यांच्या संघटन कौशल्यामुळे २७ वर्षांनंतर भाजपला हा मोठा विजय मिळाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अजूनही महाराष्ट्राचा निकाल पचवत नाहीत. त्यांनी आत्मपरीक्षण करून संघटनेमध्ये फेरबदल केले असते. तर चांगले दिवस आले असते, असेही ते म्हणाले.

धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही, तोपर्यंत कोणाचाही राजीनामा घेणार नाही. मुंडे दोषी निघाले तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याइतकी उंची राहुल सोलापूरकरांची नाही. अशा व्यक्तीने महाराजांच्या इतिहासावर किंतु, परंतु करणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad transportरस्ते वाहतूकCrime Newsगुन्हेगारी